शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ ३१ जुलैपर्यंतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:14 IST

आता दोन महिने उलटले तर योजनेची मुदत ३१ जुलैपर्यंतच असल्याने योजनेचा लाभ आता किती लोकांना मिळेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोला : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ९९६ आजारावर उपचार करण्यासाठी युनायटेड इंडिया इन्सुरन्स कंपनीसोबत शासनाने केलेला करार १ एप्रिल २०२० पासून अस्तित्वात आला तरी त्याचा निर्णय शासनाने २३ मे रोजी जाहीर केला. त्यामध्ये आता दोन महिने उलटले तर योजनेची मुदत ३१ जुलैपर्यंतच असल्याने योजनेचा लाभ आता किती लोकांना मिळेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यातील जनतेला महात्मा फुले जनधन आरोग्य योजनेतून जवळपास ९९६ विकारांवर मोफत उपचार करण्यासाठी १,५०० कोटींच्या आरोग्य विम्याचे कवच दिल्याची घोषणा शासनाने केली आहे. त्यासाठी रुग्णालयांची संख्याही ८७० पर्यंत वाढवली आहे. योजनेच्या लाभासाठी पिवळे, केशरीसोबतच शुभ्र शिधापत्रिकाधारकही पात्र ठरवण्यात आले आहेत. सोबतच अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यातील (औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा जिल्हा) शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे, तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जीवित नोंदणीकृती लाभार्थी कुटुंबांचा समावेश आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांना आरोग्यविषयक सुविधांची व्याप्ती वाढवण्याचा प्रस्ताव राज्य आरोग्य हमी सोसायटीने शासनाला दिला. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ इतर रुग्णांना मिळावा, यासाठी ही योजना सुरू झाली. त्यामध्ये लाभार्थीला ठरवून दिलेल्या ओळखपत्राच्या एका नमुन्यावरच शासनाचे ओळखपत्र दिले जाणार आहे. योजनेत यापूर्वी समाविष्ट नसलेल्या सर्व कुटुंबांना ९९६ उपचार पद्धतीचा लाभ मान्यताप्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये घेता येईल, ही योजना १ एप्रिलपासून अमलात आली; मात्र शासन निर्णय २३ मे रोजी निघाल्याने त्याचा लाभ उशिराने मिळणार आहे. त्यातच ३१  जुलै रोजी योजनेची मुदतही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता केवळ दोन महिन्यांसाठी रुग्णांना त्याचा लाभ मिळू शकतो. त्याचवेळी शासनाने विमा कंपनीला कोट्यवधीची रक्कम दिल्याने त्याचा लाभ रुग्णांऐवजी विमा कंपनीलाच अधिक होणार आहे. योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय त्यानंतर होईल. त्यातून कंपनीचे हित साधले जाण्याची शक्यताच अधिक आहे.

टॅग्स :Akolaअकोला