शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुनश्च हरिओम...पण ‘हे राम’ म्हणण्याची वेळ नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:01 IST

सोमवारपासून अ‍ॅनलॉकचा तिसरा टप्पाही सुरू होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल; मात्र हे सर्व होत असताना कोरोनाचे संकट संपलेले नाही.

- राजेश शेगोकारअकोला : लोकमान्य टिळकांनी तुरुंगातून सुटल्यावर इंग्रजांच्या विरोधात लढण्याचे शस्त्र पुन्हा हाती धरताना ‘पुनश्च हरिओम’ या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून सुरुवात केली होती. त्यानंतर पुनश्च हरिओम या शब्दांना एका म्हणीचाच दर्जा प्राप्त झाला. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी तब्बल ७३ दिवस लॉकडाऊनमुळे आपल्या सर्वांच्या मुक्त स्वातंत्र्यावर निर्बंध आले व एकप्रकारे आपण सारे बंदिस्त झालो होतो. या बंदिवासातून सुटका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम याच शब्दांचा पुनरुच्चार करून ‘अ‍ॅनलॉक’ ची प्रक्रिया सुरू झाली. सम-विषम पद्धतीने का होईना; पण बाजारपेठेतील दुकाने उघडली, बाजारपेठेत लगबगही वाढू लागली. सोमवारपासून अ‍ॅनलॉकचा तिसरा टप्पाही सुरू होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल; मात्र हे सर्व होत असताना कोरोनाचे संकट संपलेले नाही. उलट ते वाढतेच असून, रविवारी संध्याकाळी अकोल्यातील रुग्णांची संख्या ही आठशेच्या उंबरठ्यावर पोहोचली. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष नको. पूर्ण काळजी घेऊनच अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी सर्वांचीच साथ गरजेची आहे.अकोल्यातील कोरोनाचे संकट हे वाढतेच आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्याही वाढतीच असून, अकोला हे विदर्भातील सर्वात चिंताजनक शहर असल्याची चिंता खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच व्यक्त केली होती; त्यामुळे अ‍ॅनलॉकची प्रक्रिया पार पाडताना प्रशासनासोबतच सर्वच नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणे मोठे जिकिरीचे आहे. त्यामुळे दुकानदारांनी केलेल्या व्यवस्थेला ग्राहकांनीही सहकार्य केले तर थेट संपर्क टाळता येणे शक्य आहे. पी १, पी २ नुसार दुकाने उघडण्याचा नियम काटेकोर पाळल्या गेला तर बाजारपेठेतील गर्दी तशीच अर्ध्यावर येऊ शकते त्यामुळे या नियमांचे पालन करूनच अकोल्याच्या अर्थचक्राला गती मिळेल. अन्यथा नियमभंग झाल्यास प्रशासनाला पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावाच लागेल. सोबतच कोरोनालाही अधिक गती मिळण्याची शक्यताही आहे. सध्याच अकोल्यातील रुग्णवाढीचा वेग हा विदर्भात सर्वाधिक आहे. आता दिवस पावसाळ्याचे आहेत, त्यामुळे नेहमीच्या साथीच्या आजारांनी प्रतिकारशक्ती कमी होण्याचा काळ सुरू झाला असून, हाच काळ कोरोनाला पोषक ठरू शकतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनेही कोरोनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे अपेक्षित आहे. खुद्द आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अकोल्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे टांगल्या गेल्यावरही फारसा फरक पडल्याचे चित्र नाही. शहरात अनेक मंगल कार्यालये, हॉटेल्स असतानाही कोविड सेंटरसाठी शहराबाहेरच्या वसतिगृहाची निवड केली जात आहे. त्यामुळे तेथील सुविधांबाबत संदिग्ध रुग्णांची ओरड कायमच आहे. ज्या रुग्णांना डिस्चार्ज केले जात आहे त्यांच्याबाबतही प्रचंड संभ्रमाची स्थिती आहे. आरोग्य यंत्रणा नव्या नियमांवर बोट ठेवत रुग्णांना मुक्त करत आहे; मात्र त्यांच्या फेरतपासणीची कोणतीही व्यवस्था नाही, या रुग्णांना पुन्हा कुठलाही आजार झाला तर खासगी डॉक्टर त्या रुग्णाला थेट सर्वोपचारचा मार्ग दाखवितात, अशाही तक्रारी आहेत; पण त्यांची कोणीही दखल घेत नाही.अ‍ॅनलॉकच्या प्रक्रियेत लोकांचा वाढता वावर पाहता आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे आता तरी रुग्णांच्या व्यवस्थेबाबत अधिक सजग होण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात कोरोनासोबतच राहावे लागणार आहे, ही मानसिकता आता तयार होत आहे. कोरोनाचे संकट कुठूनही येऊ शकते, याचे भान सर्वांनाच ठेवावे लागणार आहे. त्यामुळे पुनश्च हरिओम म्हणताना हे भान सुटता काम नये, अन्यथा सर्वांनाच कपाळावर हात मारून ‘हे राम’ म्हणण्याची वेळ येईल.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या