शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

पुनश्च हरिओम...पण ‘हे राम’ म्हणण्याची वेळ नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:01 IST

सोमवारपासून अ‍ॅनलॉकचा तिसरा टप्पाही सुरू होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल; मात्र हे सर्व होत असताना कोरोनाचे संकट संपलेले नाही.

- राजेश शेगोकारअकोला : लोकमान्य टिळकांनी तुरुंगातून सुटल्यावर इंग्रजांच्या विरोधात लढण्याचे शस्त्र पुन्हा हाती धरताना ‘पुनश्च हरिओम’ या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून सुरुवात केली होती. त्यानंतर पुनश्च हरिओम या शब्दांना एका म्हणीचाच दर्जा प्राप्त झाला. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी तब्बल ७३ दिवस लॉकडाऊनमुळे आपल्या सर्वांच्या मुक्त स्वातंत्र्यावर निर्बंध आले व एकप्रकारे आपण सारे बंदिस्त झालो होतो. या बंदिवासातून सुटका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम याच शब्दांचा पुनरुच्चार करून ‘अ‍ॅनलॉक’ ची प्रक्रिया सुरू झाली. सम-विषम पद्धतीने का होईना; पण बाजारपेठेतील दुकाने उघडली, बाजारपेठेत लगबगही वाढू लागली. सोमवारपासून अ‍ॅनलॉकचा तिसरा टप्पाही सुरू होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल; मात्र हे सर्व होत असताना कोरोनाचे संकट संपलेले नाही. उलट ते वाढतेच असून, रविवारी संध्याकाळी अकोल्यातील रुग्णांची संख्या ही आठशेच्या उंबरठ्यावर पोहोचली. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष नको. पूर्ण काळजी घेऊनच अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी सर्वांचीच साथ गरजेची आहे.अकोल्यातील कोरोनाचे संकट हे वाढतेच आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्याही वाढतीच असून, अकोला हे विदर्भातील सर्वात चिंताजनक शहर असल्याची चिंता खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच व्यक्त केली होती; त्यामुळे अ‍ॅनलॉकची प्रक्रिया पार पाडताना प्रशासनासोबतच सर्वच नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणे मोठे जिकिरीचे आहे. त्यामुळे दुकानदारांनी केलेल्या व्यवस्थेला ग्राहकांनीही सहकार्य केले तर थेट संपर्क टाळता येणे शक्य आहे. पी १, पी २ नुसार दुकाने उघडण्याचा नियम काटेकोर पाळल्या गेला तर बाजारपेठेतील गर्दी तशीच अर्ध्यावर येऊ शकते त्यामुळे या नियमांचे पालन करूनच अकोल्याच्या अर्थचक्राला गती मिळेल. अन्यथा नियमभंग झाल्यास प्रशासनाला पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावाच लागेल. सोबतच कोरोनालाही अधिक गती मिळण्याची शक्यताही आहे. सध्याच अकोल्यातील रुग्णवाढीचा वेग हा विदर्भात सर्वाधिक आहे. आता दिवस पावसाळ्याचे आहेत, त्यामुळे नेहमीच्या साथीच्या आजारांनी प्रतिकारशक्ती कमी होण्याचा काळ सुरू झाला असून, हाच काळ कोरोनाला पोषक ठरू शकतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनेही कोरोनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे अपेक्षित आहे. खुद्द आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अकोल्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे टांगल्या गेल्यावरही फारसा फरक पडल्याचे चित्र नाही. शहरात अनेक मंगल कार्यालये, हॉटेल्स असतानाही कोविड सेंटरसाठी शहराबाहेरच्या वसतिगृहाची निवड केली जात आहे. त्यामुळे तेथील सुविधांबाबत संदिग्ध रुग्णांची ओरड कायमच आहे. ज्या रुग्णांना डिस्चार्ज केले जात आहे त्यांच्याबाबतही प्रचंड संभ्रमाची स्थिती आहे. आरोग्य यंत्रणा नव्या नियमांवर बोट ठेवत रुग्णांना मुक्त करत आहे; मात्र त्यांच्या फेरतपासणीची कोणतीही व्यवस्था नाही, या रुग्णांना पुन्हा कुठलाही आजार झाला तर खासगी डॉक्टर त्या रुग्णाला थेट सर्वोपचारचा मार्ग दाखवितात, अशाही तक्रारी आहेत; पण त्यांची कोणीही दखल घेत नाही.अ‍ॅनलॉकच्या प्रक्रियेत लोकांचा वाढता वावर पाहता आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे आता तरी रुग्णांच्या व्यवस्थेबाबत अधिक सजग होण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात कोरोनासोबतच राहावे लागणार आहे, ही मानसिकता आता तयार होत आहे. कोरोनाचे संकट कुठूनही येऊ शकते, याचे भान सर्वांनाच ठेवावे लागणार आहे. त्यामुळे पुनश्च हरिओम म्हणताना हे भान सुटता काम नये, अन्यथा सर्वांनाच कपाळावर हात मारून ‘हे राम’ म्हणण्याची वेळ येईल.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या