शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या निवेदनाला केराची टोपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST

प्रशांत विखे तेल्हारा : जिल्ह्यात होऊ घातलेला राज्य राखीव बटालियन कॅम्प सुरुवातीला तेल्हारा तालुक्यात मंजूर झाला होता. तालुक्यात सर्व ...

प्रशांत विखे

तेल्हारा : जिल्ह्यात होऊ घातलेला राज्य राखीव बटालियन कॅम्प सुरुवातीला तेल्हारा तालुक्यात मंजूर झाला होता. तालुक्यात सर्व बाबींची पूर्तता केली होती. जागा हस्तांतरण होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक तेल्हारा तालुक्याऐवजी राज्य राखीव बटालियन कॅम्प हा अकोला तालुक्यात हलविण्यात आला. राज्य राखीव बटालियन कॅम्प हा तेल्हाऱ्यातच व्हावा, अशी मागणी करीत जिल्ह्यातील भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री राज्याचे तत्कालीन गृह राज्यमंत्री व तीन आमदारांचे शिष्टमंडळ हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले; मात्र सद्य:स्थितीतही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या निवेदनाला केराची टोपली कशी काय दाखविली जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्य राखीव बटालियन कॅम्पच्या मंजुरीसाठी त्या राज्य राखीव बटालियनचे महानिरीक्षकांनी स्वत: जागेची पाहणी करून कॅम्पसाठी लागणाऱ्या सुविधांचा विचार करून तेल्हारा तालुक्यातील मनात्री बु., तळेगाव, वडणेर येथील इ-क्लासची २०० एकर जागा निश्चित करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. तेल्हारा तालुक्यातच कॅम्प मंजूर झाल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्या जागेची भूमिअभिलेख विभागामार्फत मोजणी होऊन जागा महसूल विभागाकडून पोलीस विभागाला हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती; दरम्यान, कुणालाही भनक नसताना शासनाने हा कॅम्प अकोला तालुक्यातील शिसा उदेगाव होणार असल्याचा आदेश काढला. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी याबाबत माहिती नसल्याचे सांगत थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देऊन कॅम्प तेल्हारा तालुक्यातच झाला पाहिजे, अशी मागणी केली होती. अकोला तालुक्यात कॅम्प हलविल्याने मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींचा विरोध असतानाही जागा बदलल्या गेल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिंधींच्या निवेदनाला केराची टोपली दाखविली असेच म्हणावे लागले.

------------------------------------

बटालियन कॅम्प हा शिसा उदेगाव येथे होत असल्याने तिथे जागेचा प्रस्ताव शासनाकडे जाणे बाकी आहे. त्याबाबत पूर्तता उपजिल्हाधिकारी यांच्याकडून पूर्ण करण्यात येत आहे.

-जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला.

----------------

आता सरकार बदलले, जागा बदलणार का?

तत्कालीन निर्णय झाला असताना युती सरकार होते; मात्र आता महाविकास आघाडी सरकार आहे. राज्यात सरकार बदलले, तर पुन्हा बटालियन कॅम्पची जागा बदलणार का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.