शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

विविध पद्धतीच्या आधारे विक्रमी उत्पादन घेणारा ‘समर्थ’

By admin | Updated: November 8, 2016 10:25 IST

अवघ्या दोन एकर क्षेत्रात पाण्याचा काटकसरीने वापर करून आधुनिक पद्धत अवलंबवत षेतक-याने ३ महिन्यांत विक्रमी उत्पादन घेतले आहे.

शेतकऱ्याचे यश: दोन एकर शेतात ४३२ क्विंटल मिरची

दादाराव गायकवाड, ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. ८ -  अवघ्या दोन एकर क्षेत्रात पाण्याचा काटकसरीने वापर करून आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत तीन महिन्यांत ४३२ क्विंटल मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्याची कामगिरी मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्याने केली आहे. समर्थ केशव भगत असे या शेतकऱ्याचे नाव असून, तालुक्यातील मोहगव्हाण-चांभई शिवारात त्यांचे शेत आहे.समर्थ भगत यांच्याकडे सहा एकर शेती आहे. या शेतीत ते नेहमी विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन घेतात. पिकांचे वाण, पिकाचा प्रकार याची पारख करण्यासह विषम वातावरणातही नुकसान टाळण्याचे कसब त्यांना चांगले अवगत आहे. त्यामुळेच तालुक्यातील नव्हे, तर जिल्ह्यातील काही निवडक यशस्वी शेतकऱ्यांत त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. समर्थ भगत हे प्रामुख्याने खरीपातील तूर, सोयाबीन, तसच रब्बी हंगमातील गहू, हरभरा या पिकांसह फुलकोबी, ढोबळी मिरची, सिमला मिरची, साधी मिरची, कांदा, कोथींबीर, मेथी, वांगी आदि भाजीपाला पिकांचे उत्पादन आलटून पालटून घेत असतात. यंदा त्यांनी आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आपल्या एकूण शेतापैकी ३५ गुंठे क्षेत्रात साधी मिरची लावली, तर सव्वा एकर क्षेत्रात ढोबळी आणि सिमला मिरचीची लागवड केली. यात आजवर साध्या मिरचीतून त्यांना एकशे साठ क्ंिवटल, तर ढोबळी आणि सिमला मिरचीतून २७२ क्विंटलचे उत्पादन झाले. साध्या मिरचीला सरासरी १५ रुपये प्रति किलोचा भाव मिळाल्याने त्यांना एकशे साठ क्विंटलमधून दोन लाख ४० हजार, तर ढोबळी आणि सिमला मिरचीला सरासरी १८ रुपये प्रति किलो भाव मिळाल्याने २७२ क्विंटलमधून ४ लाख ८९ हजार रुपयांचे उत्पन्न झाले, असे दोन्ही प्रकारच्या मिरचीतून अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधित त्यांना ७ लाख २९ हजार रुपयांचे विक्रमी उत्पादन झाले. मिरचीची लागवड करण्यासाठी मल्चिंग पद्धतीचा अवलंब केला. खतांचे, पाण्याचे प्रभावी नियोजन आणि योग्य काळजीमुळेच त्यांना एवढे विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले. या मिरची पिकातून त्यांना आणखी पावणे दोन क्विंटलचे उत्पादन होण्याचा विश्वास आहे.