शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

विविध पद्धतीच्या आधारे विक्रमी उत्पादन घेणारा ‘समर्थ’

By admin | Updated: November 8, 2016 10:25 IST

अवघ्या दोन एकर क्षेत्रात पाण्याचा काटकसरीने वापर करून आधुनिक पद्धत अवलंबवत षेतक-याने ३ महिन्यांत विक्रमी उत्पादन घेतले आहे.

शेतकऱ्याचे यश: दोन एकर शेतात ४३२ क्विंटल मिरची

दादाराव गायकवाड, ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. ८ -  अवघ्या दोन एकर क्षेत्रात पाण्याचा काटकसरीने वापर करून आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत तीन महिन्यांत ४३२ क्विंटल मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्याची कामगिरी मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्याने केली आहे. समर्थ केशव भगत असे या शेतकऱ्याचे नाव असून, तालुक्यातील मोहगव्हाण-चांभई शिवारात त्यांचे शेत आहे.समर्थ भगत यांच्याकडे सहा एकर शेती आहे. या शेतीत ते नेहमी विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन घेतात. पिकांचे वाण, पिकाचा प्रकार याची पारख करण्यासह विषम वातावरणातही नुकसान टाळण्याचे कसब त्यांना चांगले अवगत आहे. त्यामुळेच तालुक्यातील नव्हे, तर जिल्ह्यातील काही निवडक यशस्वी शेतकऱ्यांत त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. समर्थ भगत हे प्रामुख्याने खरीपातील तूर, सोयाबीन, तसच रब्बी हंगमातील गहू, हरभरा या पिकांसह फुलकोबी, ढोबळी मिरची, सिमला मिरची, साधी मिरची, कांदा, कोथींबीर, मेथी, वांगी आदि भाजीपाला पिकांचे उत्पादन आलटून पालटून घेत असतात. यंदा त्यांनी आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आपल्या एकूण शेतापैकी ३५ गुंठे क्षेत्रात साधी मिरची लावली, तर सव्वा एकर क्षेत्रात ढोबळी आणि सिमला मिरचीची लागवड केली. यात आजवर साध्या मिरचीतून त्यांना एकशे साठ क्ंिवटल, तर ढोबळी आणि सिमला मिरचीतून २७२ क्विंटलचे उत्पादन झाले. साध्या मिरचीला सरासरी १५ रुपये प्रति किलोचा भाव मिळाल्याने त्यांना एकशे साठ क्विंटलमधून दोन लाख ४० हजार, तर ढोबळी आणि सिमला मिरचीला सरासरी १८ रुपये प्रति किलो भाव मिळाल्याने २७२ क्विंटलमधून ४ लाख ८९ हजार रुपयांचे उत्पन्न झाले, असे दोन्ही प्रकारच्या मिरचीतून अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधित त्यांना ७ लाख २९ हजार रुपयांचे विक्रमी उत्पादन झाले. मिरचीची लागवड करण्यासाठी मल्चिंग पद्धतीचा अवलंब केला. खतांचे, पाण्याचे प्रभावी नियोजन आणि योग्य काळजीमुळेच त्यांना एवढे विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले. या मिरची पिकातून त्यांना आणखी पावणे दोन क्विंटलचे उत्पादन होण्याचा विश्वास आहे.