शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

पिण्याच्या पाण्यासाठी बारुलावासीयांचा ‘एल्गार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:16 IST

अकोला :  जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे  पिण्याच्या पाण्यासाठी बारुला विभागातील ग्रामस्थांनी ‘एल्गार’ पुकारीत गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महान धरणातून पाणी द्या!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे  पिण्याच्या पाण्यासाठी बारुला विभागातील ग्रामस्थांनी ‘एल्गार’ पुकारीत गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त १0 ऑगस्ट रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय.अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून, नदी-नाल्याच्या पात्रातील ‘झिर्‍या’च्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात यावे व गावांना पाणीपुरवठा करण्याची उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करीत बारुला विभागातल्या बारा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना देण्यात आले. यावेळी बारुला विभाग कृती समितीचे अध्यक्ष दिलीप मोहोड, आपातापा येथील सरपंच लक्ष्मी घुसे, अर्चना तालोट, वंदना तराळे, अजाबराव भोपसे, जनार्दन भातकुले, नंदकिशोर ढगे, पद्मा डाबेराव, अर्जुन चिपडे, दत्ता ढगे, दीपक मोहोड, बळीराम ढगे यांच्यासह बारुला विभागातील विविध गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते. 

जि. प. सभेचे वेधले  लक्ष; अध्यक्षांना दिले निवेदन!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने निर्माण झालेली जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाल्याच्या मुद्यावर बारुला विभागातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत धाव घेत सर्वसाधारण सभेचे लक्ष वेधले. तसेच ६0 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान धरणातून पाणी सोडण्यात यावे व पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांना देण्यात आले.