शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पिण्याच्या पाण्यासाठी बारुलावासीयांचा ‘एल्गार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:16 IST

अकोला :  जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे  पिण्याच्या पाण्यासाठी बारुला विभागातील ग्रामस्थांनी ‘एल्गार’ पुकारीत गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महान धरणातून पाणी द्या!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे  पिण्याच्या पाण्यासाठी बारुला विभागातील ग्रामस्थांनी ‘एल्गार’ पुकारीत गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त १0 ऑगस्ट रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय.अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून, नदी-नाल्याच्या पात्रातील ‘झिर्‍या’च्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात यावे व गावांना पाणीपुरवठा करण्याची उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करीत बारुला विभागातल्या बारा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना देण्यात आले. यावेळी बारुला विभाग कृती समितीचे अध्यक्ष दिलीप मोहोड, आपातापा येथील सरपंच लक्ष्मी घुसे, अर्चना तालोट, वंदना तराळे, अजाबराव भोपसे, जनार्दन भातकुले, नंदकिशोर ढगे, पद्मा डाबेराव, अर्जुन चिपडे, दत्ता ढगे, दीपक मोहोड, बळीराम ढगे यांच्यासह बारुला विभागातील विविध गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते. 

जि. प. सभेचे वेधले  लक्ष; अध्यक्षांना दिले निवेदन!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने निर्माण झालेली जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाल्याच्या मुद्यावर बारुला विभागातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत धाव घेत सर्वसाधारण सभेचे लक्ष वेधले. तसेच ६0 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान धरणातून पाणी सोडण्यात यावे व पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांना देण्यात आले.