शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी बारुलावासीयांचा ‘एल्गार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:16 IST

अकोला :  जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे  पिण्याच्या पाण्यासाठी बारुला विभागातील ग्रामस्थांनी ‘एल्गार’ पुकारीत गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महान धरणातून पाणी द्या!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे  पिण्याच्या पाण्यासाठी बारुला विभागातील ग्रामस्थांनी ‘एल्गार’ पुकारीत गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त १0 ऑगस्ट रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय.अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून, नदी-नाल्याच्या पात्रातील ‘झिर्‍या’च्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात यावे व गावांना पाणीपुरवठा करण्याची उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करीत बारुला विभागातल्या बारा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना देण्यात आले. यावेळी बारुला विभाग कृती समितीचे अध्यक्ष दिलीप मोहोड, आपातापा येथील सरपंच लक्ष्मी घुसे, अर्चना तालोट, वंदना तराळे, अजाबराव भोपसे, जनार्दन भातकुले, नंदकिशोर ढगे, पद्मा डाबेराव, अर्जुन चिपडे, दत्ता ढगे, दीपक मोहोड, बळीराम ढगे यांच्यासह बारुला विभागातील विविध गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते. 

जि. प. सभेचे वेधले  लक्ष; अध्यक्षांना दिले निवेदन!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने निर्माण झालेली जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाल्याच्या मुद्यावर बारुला विभागातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत धाव घेत सर्वसाधारण सभेचे लक्ष वेधले. तसेच ६0 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान धरणातून पाणी सोडण्यात यावे व पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांना देण्यात आले.