शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

शासनाच्या उपसमितीचा बार निघाला फुसका; घोटाळ्यांची चौकशी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:55 IST

अकोला : मनपातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मार्च २०२०मध्ये आमदारांचा समावेश असलेल्या विशेष उपसमितीचे ...

अकोला : मनपातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मार्च २०२०मध्ये आमदारांचा समावेश असलेल्या विशेष उपसमितीचे गठन केले हाेते. दहा महिन्यांचा विलंब लक्षात घेता शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा बार फुसका निघाल्याचे समोर आले आहे.

मागील तीन वर्षाच्या कालावधीत महापालिकेचा प्रशासकीय कारभार रसातळाला गेला आहे. सर्वसाधारण सभा असो वा स्थायी समितीमध्ये सत्ताधारी पक्षाकडून ठराव घेण्याच्या पद्धतीवर प्रशासनाने आक्षेप घेणे क्रमप्राप्त असताना प्रशासन मूक संमती देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अनागोंदी कारभारासंदर्भात शिवसेनेचे विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी शासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियानमधील भूमिगत गटार याेजनेचे काम नियमबाह्यरीत्या सुरू असल्याची तक्रार आ. बाजाेरियांनी शासनाकडे केली हाेती. त्यावेळी तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सदर याेजनेच्या कामाला स्थगिती दिली हाेती. हा स्थगनादेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उठविला हाेता. यासाेबतच निकृष्ट सिमेंट रस्ते घोळ, फोर-जी प्रकरण, शासनाकडून प्राप्त अनुदानाचा गैरवापर, पंतप्रधान आवास योजना तसेच १२व्या व १३व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अनियमितता यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी आ. बाजाेरियांनी शासनाकडे लावून धरली हाेती. यासंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष उपसमिती गठित केली होती. उपसमितीने महापालिकेस भेट देऊन प्रकल्पांची पाहणी करणे यासह संबंधित अधिकाऱ्यांची साक्ष नाेंदविण्याचा समावेश होता.

समितीचा गाजावाजा; चौकशी कधी?

मनपाच्या गैरकारभाराची पुनर्तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषद नियम १६७मधील तरतुदीच्या अनुषंगाने विधान परिषद सदस्यांचा समावेश असलेल्या उपसमितीचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. समितीमध्ये गटप्रमुख म्हणून विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया, आमदार शरद रणपिसे, आमदार नागोराव गाणार, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार विलास पोतनीस यांचा समावेश असला तरी प्रत्यक्षात चौकशी कधी, हा प्रश्नच आहे.

पदाधिकारी म्हणतात काहीही होणार नाही!

शासनाच्या उपसमितीकडून केल्या जाणाऱ्या चाैकशीत भूमिगत गटार याेजना, पाणीपुरवठा याेजनेतील अनियमितता तसेच निकृष्ट सिमेंट रस्ते प्रकरण, शौचालय अशा विविध घोटाळ्यांची मालिका समोर येण्याची शक्यता आता मावळली आहे. आजवर अनेक समित्यांनी चौकशी केली; पण हातात काही लागले नसल्याचे सांगत या समितीकडून काहीही होणार नसल्याचा दावा मनपा पदाधिकारी खासगीत करत आहेत.