शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

अकोला जिल्ह्यातील बपोरी पाणी पुरवठा योजनेत अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:55 IST

पिंप्री जैनपूर येथे अशाच प्रकरणात फौजदारी दाखल केल्यानंतर आता बपोरी योजना राबविणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे निर्देश जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने दिले.

ठळक मुद्देयोजनेसाठी फेब्रुवारी २०१३ मध्ये ३३ लाख ९९ हजार १५९ रुपये निधीला मंजुरी देण्यात आली. समितीमार्फत विहीर, उंच टाकीच्या कामाला सुरुवात केली; मात्र कामे पूर्ण झाली नाही. मूल्यांकनानुसार अपहार झालेली रक्कम ३ लाख १८ हजार ७४३ रुपये शासनजमा करण्याचे बजावले.

अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून कोट्यवधींचा निधी घेऊन कामे पूर्ण न करणाऱ्या जिल्ह्यातील ६९ गावांतील ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे पदाधिकारी आता फौजदारी कारवाईत अडकणार आहेत. त्यापैकी पिंप्री जैनपूर येथे अशाच प्रकरणात फौजदारी दाखल केल्यानंतर आता बपोरी योजना राबविणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे निर्देश जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने दिले.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून बपोरी पाणी पुरवठा योजनेसाठी फेब्रुवारी २०१३ मध्ये ३३ लाख ९९ हजार १५९ रुपये निधीला मंजुरी देण्यात आली. ग्राम पाणी पुरवठा समिती अध्यक्ष अतुल रामेश्वर मुगल, सचिव शीला शंकर तलवारे यांच्याकडून कामाला सुरुवात झाली. समितीकडे पहिला हप्ता ८ लाख ५३ हजार ५२९ रुपये आणि लोकवर्गणीची मिळून १० लाख २९ हजार १५८ रुपये उपलब्ध होते. त्यातून समितीमार्फत विहीर, उंच टाकीच्या कामाला सुरुवात केली; मात्र कामे पूर्ण झाली नाही. काम सुरू असताना अभियंत्यांकडून मूल्यमापन करून न घेताच १० लाख २७ हजार ३९१ रुपये समिती पदाधिकाºयांनी काढून घेतले. काम पूर्ण नसल्याने त्याबाबत पाणी पुरवठा विभागाने सातत्याने त्याबाबत समितीला कळविले, तरीही समितीने काम पूर्ण केले नाही. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने ३१ मार्च २०१८ रोजी समिती अध्यक्ष अतुल मुगल, सचिव शीला तलवारे यांना पत्र देत मूल्यांकनानुसार अपहार झालेली रक्कम ३ लाख १८ हजार ७४३ रुपये शासनजमा करण्याचे बजावले. त्या पत्रालाही समितीने दाद दिली नाही. त्यामुळे १८ जून २०१८ रोजी गटविकास अधिकारी मूर्तिजापूर यांना पत्र देत समितीच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, तसेच रक्कम वसुलीही करावी, असे निर्देश देण्यात आले; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. आता जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग कारवाईसाठी कोणता पवित्रा घेते, यावर समिती पदाधिकाºयांचे भवितव्य अवलंबून आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदfraudधोकेबाजी