शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘ईव्हीएम’ एटीएम कार्डबाबत बँका उदासीन!

By admin | Updated: April 7, 2017 00:48 IST

व्यवहारात जुनेच कार्ड : रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची होतेय अवहेलना

संजय खांडेकर - अकोलासाधे मॅगनेटिक एटीएम कार्ड जमा करून बँक खातेदारांना नवीन ईव्हीएम कार्ड तातडीने देण्यात यावेत, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले असतानाही अकोल्यात तब्बल पाच लाख ‘ईव्हीएम-चीप’विरहित असुरक्षित एटीएम कार्ड व्यवहारात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. नागरिक यापासून अनभिज्ञ असून बँक अधिकाऱ्यांनी अजूनही याबाबत गंभीरता बाळगलेली नाही.इलेक्ट्रो मॅगनेटिक व्हेरिअन्ट चीप म्हणजे ईव्हीएम-चीप असलेले एटीएम कार्डच यापुढे बँकांनी ग्राहकांना द्यावेत, जुने कार्ड जमा करून बदलून द्यावेत, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने एका वर्षाआधी दिले असले, तरी अजूनही साधे मॅगनेटिकचे लाखो एटीएम कार्ड अकोल्यात सर्रास वापरात येत आहेत. नागरिकही याबाबत विचारणा करीत नसल्याने बँक अधिकाऱ्यांनीदेखील फारसे मनावर घेतलेले नाही. एटीएम कार्डच्या मागे असलेल्या साध्या (काळी पट्टी) मॅगनेटिक एटीएम कार्डाचे क्लोनिंग देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी झालेत. अनेकांच्या बँक खात्यातील रक्कम काढली गेली. ही बाब सायबर क्राइमने अधोरेखित केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने तातडीने नियमावलीत बदल करण्याचे ठरविले. त्यासाठी ईएमव्ही चीप असलेले एटीएम शोधले गेले. मोबाइल सेल्युलर सीमकार्डाप्रमाणे चिन्ह एटीएमवर लावण्यात आले. ग्राहकांचे जुने एटीएम कार्ड जमा करून तातडीने त्यांना ईव्हीएम एटीएम कार्ड देण्याचे निर्देश दिले; मात्र या आदेशाला राष्ट्रीय आणि इतर खासगी बँकांनीही ठेंगा दाखविला आहे. अकोल्यात सात लाख एटीएम कार्डधारक असून, त्यातील जवळपास पाच लाख खातेदारांकडे जुने साधे मॅगनेटिक एटीएम कार्ड आहेत. रिझर्व्ह बँकेचे निर्देश असताना बँकेचे अधिकारी या बाबींकडे लक्ष देण्यास तयार नाहीत आणि नागरिक तेवढे जागरूक नाहीत. त्यामुळे ज्या लोकांकडे साधे मॅगनेटिक एटीएम असतील, त्यांनी आपल्या बँकेत जाऊन ईव्हीएम चीपचे एटीएम कार्डची मागणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशान्वये जिल्ह्यातील सर्व बँकांनी जुने एटीएम कार्ड जमा करून, आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असलेले ईव्हीएम कार्ड दिले पाहिजे. नागरिकांनीही तसा आग्रह संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाकडे धरावा.-तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला.