शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

शून्य ठेवीवर खाते सुरू ठेवण्यास बँकांची टाळाटाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 01:42 IST

विद्यार्थ्यांना हजार रुपये ठेवण्याचा आग्रह : योजनेच्या लाभासाठी अडचण

अकोला : शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. योजनांच्या माध्यमातून मिळणारी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. त्यासाठी शाळांना विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याचा आग्रह केला जातो; परंतु विद्यार्थ्यांचे शून्य ठेवीवर बँक खाते सुरू ठेवण्यासाठी बँका टाळाटाळ करीत असून, किमान हजार रुपये बॅलन्स विद्यार्थ्यांनी ठेवण्याचा बँकांकडून आग्रह केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती, प्रोत्साहन भत्त्यासारख्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. पहिली ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या शिक्षण विभागाच्यावतीने विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, अपघात विमा योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मोफत गणवेश योजना राबविल्या जातात. पूर्वी शासनाकडून विद्यार्थ्यांना रोख किंवा धनादेशाद्वारे योजनेचा लाभ दिल्या जात होता; परंतु यामध्ये अपहार झाल्याच्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत योजनेची रक्कमच पोहोचत नव्हती, त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून योजना लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचे शिक्षण विभागाला आदेश दिले. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळांना विद्यार्थी व त्यांच्या आईच्या नावे संयुक्तरीत्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यास सांगितले; परंतु जिल्ह्यातील सर्वच बँका विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यासाठी आणि सुरू ठेवण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. मुख्याध्यापकांसह पालक व विद्यार्थी राष्ट्रीयीकृत बँका, पोस्टामध्ये खाते उघडण्यासाठी जात आहेत; परंतु त्यांना आम्ही झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यास सक्षम नसल्याचे बँकांकडून सांगुन विद्यार्थ्यांना पळवून लावल्या जात आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर २0१७ शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असल्याने, मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होते; परंतु बँका झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यास नकार देत असल्याने विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. खाते उघडल्याशिवाय शासनाच्या योजनांच्या लाभाची रक्कम आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालक व मुख्याध्यापकांना भेडसावू लागला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे!विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्सवर खाते सुरू ठेवण्यासाठी बँका टाळाटाळ करीत आहेत, तसेच खाते सुरू ठेवण्यासाठी किमान हजार रुपयांचे बॅलन्स ठेवण्याचा आग्रह होत आहे. जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे आणि बँकांना विद्यार्थ्यांचे बँक खाते सुरू ठेवण्यास बजावावे, अशी पालकांकडून मागणी होत आहे. खाते बंद असल्याने शिष्यवृत्ती परतविद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पुरेसे बॅलन्स नसल्यामुळे त्यांचे खाते बंद पडत आहे. खाते बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली शिष्यवृत्ती परत जात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी बँक व्यवस्थापकांच्या सभेचे आयोजन करून त्यांना विद्यार्थ्यांचे बँक बंद न करण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे; तसेच शाळेचे खाते व्यावसायिक नसल्यामुळे बँक खात्यामधून अकाउंटंट मेंटेनन्स व मिनिमम बॅलन्स चार्जेसच्या नावाखाली बँक खात्यातून पैसे कमी केल्या जातात. त्यावर नियंत्रण घालण्याची मागणीही मुख्याध्यापक संघाने केली. याप्रकरणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती करणार आहोत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून विनंतीचे पत्रसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. - प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी