शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

कर्ज पुनर्गठणाची माहिती देण्यास बँकांची टाळाटाळ

By admin | Updated: June 10, 2015 02:10 IST

शासन गंभीर; १६ जून रोजी बोलावली आढावा बैठक.

अकोला : शेतकर्‍यांच्या कर्ज पुनर्गठणाबाबत शासन गंभीर असून, यासंदर्भात १६ जून रोजी आढावा बैठक बोलाविण्यात आली आहे. याकरिता प्रत्येक जिल्ह्याची लीड बँक जिल्ह्यातील सर्व बँकांची कर्जवाटपासंबंधी माहिती घेतली जात असली, तरी बँका मात्र ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. गतवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप व रबी या दोन्ही हंगामांमध्ये शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. दोन्ही हंगामात उत्पादनात घट आल्यामुळे कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला. त्यातच बँकांकडून कर्जवसुलीचा तगादा सुरू होता. कर्ज कसे भरावे, या चिंतेत शेतकरी होते. शेतकर्‍यांकडे कर्ज भरण्यासाठी पैसेच नव्हते. त्यामुळे शासनाने यावर्षी मागील कर्ज न भरता त्याचे पुनर्गठण करीत नवीन कर्ज देण्याची घोषणा केली. त्यामुळे सुखावलेले शेतकरी आता बँकांमध्ये जाऊन कर्ज पुनर्गठणासाठी गर्दी करीत आहेत. शासनाने कर्ज पुनर्गठणाचा निर्णय घेतला असला तरी बँका मात्र उदासीन आहेत. आतापर्यंत संपूर्ण राज्यात १५ टक्क्यांच्या जवळपास कर्जाचे पुनर्गठण झाले आहे. त्यामुळे याबाबत गंभीर होऊन मुख्यमंत्र्यांनी कर्ज पुनर्गठण न करणार्‍या बँकांवर गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली आणि १६ जून रोजी मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यातील कर्ज पुनर्गठणाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याकरिता लीड बँकांकडून जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कर्ज पुनर्गठणाबाबतची माहिती मागविण्यात आली आहे; मात्र बँकांच्यावतीने माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

*पत्रांनाही केराची टोपली

        कर्ज पुनर्गठणाबाबत माहिती देण्यासाठी लीड बँकेच्यावतीने जिलतील बँकांना वारंवार पत्र देण्यात येत आहे; मात्र त्यानंतरही बँकांच्यावतीने पुनर्गठणाबाबत माहिती दिली जात नाही, हे विशेष.