शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

पात्र-अपात्र शेतकरी ठरविण्याचा बँकांपुढे पेच

By admin | Updated: July 14, 2017 02:02 IST

बँकांनाच सूचना नाहीत; कर्जमाफीची कशी होणार अंमलबजावणी?

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली; मात्र कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात बँकांना शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफी योजनेत पात्र, अपात्र शेतकरी ठरविण्याचा पेच बँकांपुढे निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असली, तरी अंंमलबजावणी कशी होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत प्रारंभी १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत गत २८ जून रोजी काढण्यात आला. त्यानंतर कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवित सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय गत आठवड्यात शासनामार्फत जाहीर करण्यात आला. परंतु, कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफी योजनेत पात्र आणि अपात्र शेतकरी कसे ठरविणार, याबाबतचा प्रश्न बँकांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली, तरी याबाबत बँकांना शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या नसल्याने, कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी होणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात शासनाकडून बँकांना सूचना केव्हा देण्यात येणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.मार्गदर्शक सूचनाही नाही!थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत असल्याचा शासन निर्णय २८ जून रोजी काढण्यात आला; मात्र या कर्जमाफी योजनेत पात्र ठरणारे शेतकरी आणि द्यावयाचा कर्जमाफीचा लाभ, यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचनादेखील अद्याप बँकांसह संबंधित यंत्रणांकडे प्राप्त झाल्या नाहीत.कर्जमाफीच्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत बँकांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र आणि अपात्र ठरणारे शेतकरी ठरविणे बँकांसाठी कठीण बाब आहे. शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतरच यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.- तुकाराम गायकवाडव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक