शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

पात्र-अपात्र शेतकरी ठरविण्याचा बँकांपुढे पेच

By admin | Updated: July 14, 2017 02:02 IST

बँकांनाच सूचना नाहीत; कर्जमाफीची कशी होणार अंमलबजावणी?

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली; मात्र कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात बँकांना शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफी योजनेत पात्र, अपात्र शेतकरी ठरविण्याचा पेच बँकांपुढे निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असली, तरी अंंमलबजावणी कशी होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत प्रारंभी १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत गत २८ जून रोजी काढण्यात आला. त्यानंतर कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवित सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय गत आठवड्यात शासनामार्फत जाहीर करण्यात आला. परंतु, कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफी योजनेत पात्र आणि अपात्र शेतकरी कसे ठरविणार, याबाबतचा प्रश्न बँकांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली, तरी याबाबत बँकांना शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या नसल्याने, कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी होणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात शासनाकडून बँकांना सूचना केव्हा देण्यात येणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.मार्गदर्शक सूचनाही नाही!थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत असल्याचा शासन निर्णय २८ जून रोजी काढण्यात आला; मात्र या कर्जमाफी योजनेत पात्र ठरणारे शेतकरी आणि द्यावयाचा कर्जमाफीचा लाभ, यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचनादेखील अद्याप बँकांसह संबंधित यंत्रणांकडे प्राप्त झाल्या नाहीत.कर्जमाफीच्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत बँकांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र आणि अपात्र ठरणारे शेतकरी ठरविणे बँकांसाठी कठीण बाब आहे. शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतरच यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.- तुकाराम गायकवाडव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक