शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

पात्र-अपात्र शेतकरी ठरविण्याचा बँकांपुढे पेच

By admin | Updated: July 14, 2017 02:02 IST

बँकांनाच सूचना नाहीत; कर्जमाफीची कशी होणार अंमलबजावणी?

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली; मात्र कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात बँकांना शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफी योजनेत पात्र, अपात्र शेतकरी ठरविण्याचा पेच बँकांपुढे निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असली, तरी अंंमलबजावणी कशी होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत प्रारंभी १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत गत २८ जून रोजी काढण्यात आला. त्यानंतर कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवित सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय गत आठवड्यात शासनामार्फत जाहीर करण्यात आला. परंतु, कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफी योजनेत पात्र आणि अपात्र शेतकरी कसे ठरविणार, याबाबतचा प्रश्न बँकांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली, तरी याबाबत बँकांना शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या नसल्याने, कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी होणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात शासनाकडून बँकांना सूचना केव्हा देण्यात येणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.मार्गदर्शक सूचनाही नाही!थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत असल्याचा शासन निर्णय २८ जून रोजी काढण्यात आला; मात्र या कर्जमाफी योजनेत पात्र ठरणारे शेतकरी आणि द्यावयाचा कर्जमाफीचा लाभ, यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचनादेखील अद्याप बँकांसह संबंधित यंत्रणांकडे प्राप्त झाल्या नाहीत.कर्जमाफीच्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत बँकांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र आणि अपात्र ठरणारे शेतकरी ठरविणे बँकांसाठी कठीण बाब आहे. शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतरच यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.- तुकाराम गायकवाडव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक