शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बँकांची नकारघंटा!

By admin | Updated: June 17, 2015 02:17 IST

मुख्यमंत्र्यांच्या इशा-याला केराची टोपली; कर्ज पुनर्गठन नाहीच!

अकोला : मुख्यमंत्र्यांनी बँकांना कर्ज पुनर्गठनासाठी १५ जूनपर्यंत डेडलाईन दिली असल्यावरही बँका जुमानत नसून, कर्ज पुनर्गठनासाठी शेतकर्‍यांना प्रचंड प्रताडीत करीत आहेत. पेरणीचा हंगाम तोंडावर आला असला तरी बँकांची अजून नकारघंटाच सुरू असून, ना कर्ज देत आहेत, ना किती कर्ज दिले याची माहिती देत आहेत. त्यामुळे जिल्हा अग्रणी बँकचे अधिकारी वैतागले आहे. गतवर्षी शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागल्यामुळे यावर्षी कर्जाची वसुली न करता कर्ज पुनर्गठन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासन कर्ज पुनर्गठनाबाबत सकारात्मक असले तरी बँकांनी आडमुठेपणाची भूमिका स्वीकारली आहे. पीककर्ज व कर्ज पुनर्गठनाची मुदत ३0 जून देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र बँकांना १५ जूनच्या आतच कर्जाचे पुनर्गठन करण्याचा आदेश दिला आहे; मात्र त्यानंतरही बँका मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही जुमानत नसून, कर्ज पुनर्गठनास नकार देत आहे. ३१ मेपर्यंत जिल्हय़ातील बँकांनी केवळ १२ टक्के शेतकर्‍यांचे कर्ज पुनर्गठन केले होते. जिल्हा अग्रणी बँकेने जिल्हय़ातील बँकांना १५ जूनपर्यंत किती शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले, याची माहिती मागविली आहे; मात्र या बँका ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने तीनदा पत्र देऊनही बँकांनी अद्याप माहिती दिली नाही. बँका कर्ज देण्यासोबतच माहिती देण्यासही टाळाटाळ करीत आहे.