शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
5
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
6
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
7
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
8
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
9
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
10
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
11
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
12
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
13
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
14
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
15
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
16
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
18
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
19
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
20
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद

बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधी कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 15:04 IST

अकोला: आर्थिक वर्ष संपत आले असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नसून, बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधीही कागदावरच असल्याने, यावर्षीही पूर्णा बॅरेजसह इतर प्रकल्पांच्या कामावर परिणाम होणार आहे.

अकोला: आर्थिक वर्ष संपत आले असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नसून, बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधीही कागदावरच असल्याने, यावर्षीही पूर्णा बॅरेजसह इतर प्रकल्पांच्या कामावर परिणाम होणार आहे.जिल्ह्यात पूर्णा बॅरेज-२, कवठा, शहापूर, नया अंदुरा, उमा, काटेपूर्णा, घुंगशी बॅरेजची कामे अर्धवट असून, मूर्तिजापूर तालुक्यातील वाई संग्रहकाचेही पाच टक्के काम शिल्लक आहे. या प्रकल्पांसाठी लागणारा उपलब्ध नियमित निधी अपुरा असून, अतिरिक्त निधीची गरज आहे. यासाठीचे समायोजन पुढच्या महिन्यात केले जाणार असल्याचे पाटबंधारेच्या सूत्राने सांगितले; पण पुढच्या महिन्यात झाल्यास एक महिन्यात किती निधी खर्च करणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्य शासनाचा निधी अपुरा पडत असल्याने केंद्र शासनाने बळीराजा जलसंजीवनी योजनेतून विभागासाठी १,४०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. तथापि, यातील एकही पैसा अद्याप मिळाला नसल्याचे चित्र आहे. खारपाणपट्ट्यातील पूर्णा बॅरेजचे काम ९० टक्के झाले असून, यावर्षी जून महिन्यात या बॅरेजमध्ये जलसाठा करण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे; पण या बॅरेजच्या वक्रद्वारासह इतर महत्त्वाची कामे अद्याप झाली नाहीत. त्यामुळे यावर्षी जूनमध्ये पाणी साठवणार कसे, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.रेतीचे दर अद्याप निश्चित झाले नसून, सिमेंटीकरणाचे कामही करायचे आहे. पंप हाउसचे काम कधी होणार, हा प्रश्न आहे. आता पंप हाउसऐवजी नवीनच पंप टाकण्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे पुन्हा या नवीन पंपाचे नकाशे, डिझाइनसाठी दोन, चार वर्षे लागू शकतात. अगोदरच्याच डिझाइनला प्राप्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाला वाºया कराव्या लागल्या. त्यानंतर तीन ते चार वर्षांनंतर हे डिझाइन प्राप्त झाले. याच पंपाचे बांधकाम करण्यासाठी आणखी एक-दोन वर्षे लागण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या सूत्राने व्यक्त केली. खारपाणपट्ट्यातील हे बॅरेज शेतकºयांना दिलासा देणारे तर आहेच, शिवाय यातून अकोलकरांनाही पिण्यासाठी पाणी मिळू शकते, असे सर्व असताना या बॅरेजच्या कामाला पूर्ण निधी का मिळत नाही, असा प्रश्न या भागातील शेतकºयांना पडला आहे.

- खारपाणपट्ट्यात सतत जाणवणारी भीषण दुष्काळी स्थिती बघता या बॅरेजचे काम होणे गरजेचे आहे; परंतु अद्याप या कामाला गती नसून, निधीचीही पूर्तता नसल्याने मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना नुकतेच निवेदन दिले आहे.प्रदीपबाप्पू देशमुख,सचिव,अकोला जिल्हा जलसंघर्ष समिती.

 

टॅग्स :AkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजना