शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

बाळापूर तालुक्यात सोयाबीनसह कपाशी, तुरीचा पेरा वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

वेध पेरणीचे बाळापूर: तालुक्यात यंदा सोयाबीनसह कपाशी, तूर पिकाचा पेरा वाढणार असून, ज्वारी, मका, मूग, उडीद पिकांचा ...

वेध पेरणीचे

बाळापूर: तालुक्यात यंदा सोयाबीनसह कपाशी, तूर पिकाचा पेरा वाढणार असून, ज्वारी, मका, मूग, उडीद पिकांचा पेरा घटणार असल्याचे कृषी विभागाच्या माहितीवरुन समजते. सद्यस्थितीत तालुक्यात शेती मशागतीची कामे आटोपली असून, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात जवळपास पाच टक्के पेरणी आटोपल्याची माहिती आहे.

गतवर्षी मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पंधरा दिवस दडी दिल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. यंदा बियाणांचे वाढलेले दर व कमतरता पाहता शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते. दरम्यान, सुरुवातीला चांगला पाऊस बरसल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

-----------------------

५९ हजार ७७३ हेक्टरवर होणार पेरणी

बाळापूर तालुक्यातील अर्धा भाग खारपाणपट्ट्याने व्यापला असून, दहा टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार तालुक्यातील वहिती क्षेत्र ६० हजार ७०८ हेक्टर असून, पेरणी योग्य क्षेत्र ५९ हजार ७७३ हेक्टर आहे. यामध्ये सोयाबीन २१,२१७ हेक्टर, कपाशी १८,९८० हेक्टर, तूर ८,००७ हेक्टर क्षेत्र, मूग ६,१३० हेक्टर, उडीद ३,७३० हेक्टर, ज्वारी १,४४० हेक्टर, मका १५८ हेक्टर व इतर पिके १११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे.तालुक्यात सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस नसल्याने सात महसूल मंडळातील पडणाऱ्या पावसाचे आकडे वेगवेगळे येत आहे.

-----------------

शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी ओल किमान १०० मि.मी. पाऊस पडल्यावरच पेरणी करावी. बियाणांची कमतरता पाहता दुबार पेरणी बियाणाचे संकट ओढू नये, यासाठी बियाण्याला पेरणीपूर्वी कल्चर लावून पेरणी करावी. तालुक्यात ५ टक्के पेरणी आटोपली आहे.

-नंदकुमार माने, तालुका कृषी अधिकारी, बाळापूर.

-------------------------

शेती मशागतीचे कामे पूर्णत्वास गेली आहेत. पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बी-बियाणांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

-महेश चव्हाण, शेतकरी, कवठा.