शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

आयुष्यमान भारत योजना; लाभार्थींची नावे सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 10:29 IST

काही नागरिकांच्या नावांचा यादीत समावेश असला तरी शेजारच्या नागरिकांचा यादीत समावेश नसल्याचे दिसून आले.

अकोला: शहरात मागील सात दिवसांपासून आयुष्यमान भारत योजने अंतर्गत ‘गोल्डन कार्ड’च्या नोंदणीसाठी विविध प्रभागांमध्ये नगरसेवकांच्या स्तरावर शिबिराचे आयोजन केले जात आहे. २०११ मध्ये आशा स्वयंसेविकांनी सर्व्हे व नोंदणी केलेल्या लाभार्थींच्या नावांचा समावेश आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्राह्य धरल्या जात असल्याचा दावा नगरसेवकांच्या स्तरावर केला जात असला तरी सदर याद्यांमधून बहुतांश नागरिकांची नावे गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभागातील लाभार्थींची नावे शोधताना नगरसेवकांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे.आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रति कुटुंबातील व्यक्तीला कोणत्याही स्वरूपाचा आजार झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी ५ लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. योजनेंतर्गत विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करता येणार आहेत. त्यासाठी शासनाने प्राधिकृत केलेल्या शासकीय, खासगी हॉस्पिटलमध्ये संबंधित रुग्णावर मोफत उपचार केले जातील. दरम्यान, या योजनेसाठी २०११ मध्ये आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जाऊन सर्व्हे करीत कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावाची नोंदणी केल्याचा दावा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपने सदर योजने अंतर्गत यादीमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थींच्या नावाने ‘गोल्डन कार्ड’ तयार करण्यासाठी शिबिरांचे शहरात ठिकठिकाणी आयोजन केले. प्रत्यक्षात नगरसेवकांना प्राप्त याद्यांमधून अनेक नागरिकांची नावे गहाळ झाल्याचे समोर आले आहे. एकाच प्रभागात तसेच एकाच गल्लीबोळात राहणाºया काही नागरिकांच्या नावांचा यादीत समावेश असला तरी शेजारच्या नागरिकांचा यादीत समावेश नसल्याचे दिसून आले.सर्व्हे नेमका झाला कधी?नगरसेवकांनी प्रत्येक प्रभागात आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ देण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले. यावेळी आशा सेविकांनी २०११ मध्ये केलेल्या सर्व्हेचा दावा केला जात असला तरी २००६-०७ मध्ये अशा प्रकारचा सर्व्हे झाल्याचे बोलल्या जात आहे. त्यानंतर दहा वर्षांनंतर अर्थात २०१७ मध्ये असा सर्व्हे पुन्हा होणे अपेक्षित होते. त्यामुळे हा सर्व्हे नेमका झाला कधी, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.दुसरा सर्व्हे कधी; नगरसेवकांची चुप्पीज्या नागरिकांची नावे यादीत आढळून आली नाहीत, त्यांच्या नावांचा दुसºया सर्व्हेत समावेश केला जाईल, असा आशावाद नगरसेवकांकडून दाखवण्यात आला; परंतु हा दुसरा सर्व्हे कधी होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला असता त्यावर नगरसेवकांनी चुप्पी साधणे पसंत केले आहे.

नगरसेवकांची शोधाशोधनगरसेवकांकडे उपलब्ध असलेल्या याद्यांमध्ये प्रभागांशिवाय चक्क दुसऱ्या तालुक्यातील लाभार्थींच्या नावाचा समावेश असल्याचे दिसून आले. शिबिरामध्ये ‘गोल्डन कार्ड’मिळेल या अपेक्षेने गेलेल्या नागरिकांची नावे शोधताना नगरसेवकांची चांलगीच दमछाक झाली. यादीत नावाचा समावेश नसल्यामुळे गरजू नागरिकांचा हिरमोड झाला.

 

टॅग्स :Akolaअकोलाayushman bharatआयुष्मान भारत