शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

विघ्नहर्त्याच्या उत्सवात वीज अपघाताचे विघ्न टाळा- मुख्य अभियंता डॉ. केळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 6:48 PM

विघ्नहर्त्याच्या उत्सवात वीज अपघाताचे विघ्न टाळावे, असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी लोकमत’शी केलेल्या खास बातचित दरम्यान केले.

- अतुल जयस्वालअकोला : गणेश मंडळांवर वीज देयकाचा भूर्दंड वाढू नये, यासाठी महावितरणने सवलतीच्या दरात वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याची योजना सुरु केली आहे. गणेश मंडळांनी या योजनेचा लाभ घेऊन अधिकृत वीज जोडणी घ्यावी, तसेच सुरक्षा उपायांचे पालन करून विघ्नहर्त्याच्या उत्सवात वीज अपघाताचे विघ्न टाळावे, असे आवाहन महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी केलेल्या खास बातचित दरम्यान केले.प्रश्न : गणेश मंडळांना वीज पुरवठ्यासाठी महावितरणने काय व्यवस्था केली आहे?डॉ. केळे : गणेश मंडळांना सवलतीच्या दरात अधिकृतपणे वीज पुरवठा घेता यावा, यासाठी महावितरणच्यावतीने दरवर्षी योजना अंमलात आणली जाते. या योजनेअंतर्गत गणेश मंडळांना सामान्य वीज दराच्या निम्मे म्हणजे ४ रुपये ३८ पैसे दराने वीज बिल आकारले जाते. एवढेच नव्हे, तर गणेश मंडळांसाठी महावितरणच्या कार्यालयात ‘एक खिडकी’ योजनाही सुरु करण्यात येते.प्रश्न : आतापर्यंत किती मंडळांनी अधिकृत वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत?डॉ. केळे : महावितरणने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी गणेश मंडळांकडून बुधवार दूपारपर्यंत तरी पुरेसा प्रतिसाद मिळालेला नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील नोंदणीकृत मंडळांपैकी केवळ ३१ मंडळांचे अर्ज आले आहेत.प्रश्न : सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत ?डॉ. केळे : गणेश उत्सवादरम्यान अधिकृत तंत्रज्ञाकडून वीज जोडणी करून घेतल्यास अपघाताची शक्यता कमी असते. सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणकडून तयारी करण्यात आली आहे. अलिकडेच विद्युत निरीक्षकांची बैठक घेण्यात आली असून, विद्युत निरीक्षक गणेश मंडळांना भेट देऊन सुरक्षा उपायांची पाहणी करतील.प्रश्न. वीज अपघात होऊ नये म्हणून काय संदेश द्याल?डॉ. केळे : गणेशोत्सव हा मांगल्याचा उत्सव आहे. विघ्नहर्त्याच्या या उत्सवात वीज अपघाताचे विघ्न येऊ नये, यासाठी अधिकृत वीज जोडणी घेऊन, अधिकृत तंत्रज्ञाकडून जोडणी करून घ्यावी. सुरक्षा उपायांकडे लक्ष दिल्यास वीज अपघात होणार नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणGanpati Festivalगणेशोत्सव