शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जैवविविधता व्यवस्थापन समितीकडे स्वायत्त संस्थांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:50 IST

बहुतांश स्वायत्त संस्थांनी या समितीचे गठनच केले नसल्याची माहिती आहे.

अकोला: राज्य शासनाने जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे गठन करून नोंदवही (पीबीआर) तयार करण्याचे राज्यातील स्वायत्त संस्थांना निर्देश दिले होते. समितीचे गठन केल्यानंतर संबंधित कार्यवाही पूर्ण न केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना दर महिन्याला १० लाख रुपये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्याचे स्पष्ट निर्देश होते. नोंदवही (पीबीआर)तर सोडाच, बहुतांश स्वायत्त संस्थांनी या समितीचे गठनच केले नसल्याची माहिती आहे. याप्रकरणी कें द्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. हवा, पाणी प्रदूषित होऊन त्याचा परिणाम जैवविविधतेवर होत असल्याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने स्वायत्त संस्थांच्या स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समिती गठित करण्याचे निर्देश जारी केले. यामध्ये प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणारे प्रदूषण व पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांसह विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. स्वायत्त संस्थांनी अनुसूचित जाती-जमातीमधील महिला सदस्य, वन विभाग प्रतिनिधी, पदसिद्ध कृषी विभाग प्रतिनिधी, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, मत्स्य व्यवसाय, आदिवासी विकास विभाग आदी विभागातील प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश करण्याचे निर्देश आहेत. समितीचे गठन केल्यानंतर ३१ जानेवारी २०२० पर्यंत जैवविविधता नोंदवही (पीबीआर) तयार करणे क्रमप्राप्त होते. स्वायत्त संस्थांच्या स्तरावर अद्यापही समित्यांचे गठनच केले नसल्याचे समोर आले आहे.समिती कागदावर!शासकीय कार्यालयांमध्ये वरिष्ठांकडून अधिनस्त महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचे ध्यानात घेऊन शासनाने विशाखा समितीचे गठन करण्याचे निर्देश दिले होते. जैवविविधता व्यवस्थापन समितीचा उद्देश लक्षात घेता स्वायत्त संस्थांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्याने शासनाच्या अनेक समित्या कागदांवर राहत असल्याची परिस्थिती आहे.