शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पावसाळा तोंडावर; खड्डे बाकी, वृक्ष लागवड होणार कशी?

By संतोष येलकर | Updated: May 14, 2024 21:00 IST

आचारसंहितेत अडकले नियोजन : तांत्रिक, प्रशासकीय मान्यताही रखडल्या

अकोला: पावसाळा तोंडावर आला असला तरी, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील यंदाच्या वृक्ष लागवडीचे नियोजन अडकले आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता रखडल्याच्या स्थितीत वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्याची कामे सुरू होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे वृक्ष लागवड सुरू होणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

दरवर्षी पावसाळ्यात ‘नरेगा’ अंतर्गत वृक्ष लागवड केली जाते. त्यापूर्वी ग्रामपंचायती आणि यंत्रणास्तरावरील वृक्ष लागवडीचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत केले जाते, परंतु यंदा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, जिल्ह्यातील वृक्ष लागवडीच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे. पावसाळा सुरू होण्यास १८ दिवसांचा कालावधी उरला असतानाही वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्याची कामे अद्याप सुरू हाेऊ शकली नाहीत. त्यानुषंगाने जिल्ह्यात वृक्ष लागवड सुरू होणार तरी कधी, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. १३,७०३ कामे प्रस्तावित!‘नरेगा’ अंतर्गत यंदाच्या जिल्ह्यातील कामांच्या आराखड्यात ग्रामपंचायतींच्या स्तरावर ९ हजार आणि विविध शासकीय यंत्रणांच्या स्तरावर ४ हजार ७०३ अशी एकूण १३ हजार ७०३ वृक्ष लागवडीची कामे प्रस्तावित असून, या कामांची अंदाजपत्रकीय किंमत ३०६ कोटी ९१ लाख रुपये आहे. वृक्ष लागवडीच्या एका कामात एक हजार ते १ हजार ६०० रोपांची लागवड केली जाते, अशी जिल्हा परिषद ‘नरेगा ’ कक्षाच्या सूत्रांनी दिली. ग्रामपंचायतींचे ठरावही रेंगाळले !वृक्ष लागवडीच्या कामांसाठी ग्रामपंचायतींनी ठराव घेणे आवश्यक आहे; मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून यासंदर्भात ठराव घेण्याची प्रक्रिया देखील रेंगाळली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यातील वृक्ष लागवडीच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.एच.जे.परिहारगटविकास अधिकारी (नरेगा) , जिल्हा परिषद.

टॅग्स :Akolaअकोला