शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भूखंडाच्या आर्थिक वादातून आसिफ खानची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:42 IST

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसीफ खान यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक केल्यानंतर उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी अकोला पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दुसरीकडे सहा दिवसांचा कालावधी उलटल्यावरही मृतदेह सापडला नसल्याने हा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान अकोला पोलिसांसमोर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर ...

ठळक मुद्देतीन आरोपींना अटक केल्यानंतर उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी अकोला पोलिसांनी शोध सुरू केला आहे.आसीफ खान यांची हत्या केल्यानंतर मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदी पात्रात फेकण्यात आला. आसीफ खान यांची गळा आवळून हत्या क रताना त्यांनी प्रतिकार केल्याची कबुली पोलिसांनी दिली.

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसीफ खान यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक केल्यानंतर उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी अकोला पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दुसरीकडे सहा दिवसांचा कालावधी उलटल्यावरही मृतदेह सापडला नसल्याने हा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान अकोला पोलिसांसमोर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

प्लॉटच्या आर्थिक वादातून हत्या

वाशिम जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष ज्योती अनिल गणेशपुरे व आसीफ खान मुस्तफा खान यांनी पार्टनरशीपमध्ये प्लॉट व फ्लॅटसह शेती खरेदी केलेली आहे. गत चार वर्षांपासून या दोघांचे आर्थिक व्यवहार असल्याचेही समोर आले आहे; मात्र गत काही दिवसांपासून एका प्लॉटच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद सुरू झाले. याच वादातून आसीफ खान यांची हत्या झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासोबतच या हत्या प्रकरणाला आणखी काही कंगोरे असले, तरी पोलिसांकडे त्याचे पुरावे नसल्यामुळे पोलीस अधिकाºयांनी त्या विषयावर बोलण्याचे टाळले.हत्येला अपघाताचा बनावआसीफ खान यांची हत्या केल्यानंतर मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदी पात्रात फेकण्यात आला, त्यानंतर आसीफ खान यांची एमएच ०१ सीए १३३९ क्रमांकाची कार नदीत लोटण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र सदर कार चिखलात फसल्यामुळे ती नदीत लोटण्याचा प्रयत्न फसला. यातच हत्येचा अपघात बनविण्याचा डावही अयशस्वी ठरल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. या हत्याकांडानतर अपघात दाखविण्याचा बनाव सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

अमरावती जिल्ह्यातील आमला येथे केली हत्या!अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आमला या गावात ज्योती गणेशपुरे हिची बहीण रहिवासी आहे. याच ठिकाणी आसीफ खानला बोलावून आमला गावातच त्यांची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. ज्योती अनिल गणेशपुरे, वैभव अनिल गणेशपुरे व स्वप्निल नितीन वानखडे या तिघांसोबतच आणखी तीन आरोपींचा आसीफ खानच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचेही समोर आले आहे.कारमधील रक्ताचे नमुने घेतले!आसीफ खान यांची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांचीच एमएच ०१ सीए १३३९ क्रमांकाच्या कारमध्ये म्हैसांग येथील पूर्णा नदीवर आणण्यात आला. सदरचा मृतदेह एका चादरमध्ये गुंडाळून आणण्यात येत असताना आसीफ खानच्या रक्ताचे डाग कारमध्ये दोन ठिकाणी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, ते चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

रक्त नमुने जुळविण्यासाठी ‘डीएनए’चा पर्यायकारमध्ये आढळलेले रक्ताचे डाग हे आसीफ खानचेच आहेत का, यावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यासाठी आसीफ खान यांच्या कुटुंबीयातील व्यक्तीचे रक्त नमुने घेऊन डीएनए करण्याचा पर्याय पोलिसांकडे खुला असून, त्या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत; मात्र त्यापूर्वी मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

प्रतिकारातील चाकू जप्तआसीफ खान यांची गळा आवळून हत्या क रताना त्यांनी प्रतिकार केल्याची कबुली पोलिसांनी दिली. या प्रतिकारात आसीफ खानने चाकूने हल्ला केल्यामुळे ज्योती गणेशपुरे यांच्या गळ्यावर मोठी जखम झाली आहे, तर त्यांचा मुलगा वैभवही जखमी झाला आहे. सदरचा चाकू पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाMurderखून