शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भूखंडाच्या आर्थिक वादातून आसिफ खानची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:42 IST

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसीफ खान यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक केल्यानंतर उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी अकोला पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दुसरीकडे सहा दिवसांचा कालावधी उलटल्यावरही मृतदेह सापडला नसल्याने हा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान अकोला पोलिसांसमोर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर ...

ठळक मुद्देतीन आरोपींना अटक केल्यानंतर उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी अकोला पोलिसांनी शोध सुरू केला आहे.आसीफ खान यांची हत्या केल्यानंतर मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदी पात्रात फेकण्यात आला. आसीफ खान यांची गळा आवळून हत्या क रताना त्यांनी प्रतिकार केल्याची कबुली पोलिसांनी दिली.

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप-बमसंचे नेते आसीफ खान यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक केल्यानंतर उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी अकोला पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दुसरीकडे सहा दिवसांचा कालावधी उलटल्यावरही मृतदेह सापडला नसल्याने हा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान अकोला पोलिसांसमोर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

प्लॉटच्या आर्थिक वादातून हत्या

वाशिम जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष ज्योती अनिल गणेशपुरे व आसीफ खान मुस्तफा खान यांनी पार्टनरशीपमध्ये प्लॉट व फ्लॅटसह शेती खरेदी केलेली आहे. गत चार वर्षांपासून या दोघांचे आर्थिक व्यवहार असल्याचेही समोर आले आहे; मात्र गत काही दिवसांपासून एका प्लॉटच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद सुरू झाले. याच वादातून आसीफ खान यांची हत्या झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासोबतच या हत्या प्रकरणाला आणखी काही कंगोरे असले, तरी पोलिसांकडे त्याचे पुरावे नसल्यामुळे पोलीस अधिकाºयांनी त्या विषयावर बोलण्याचे टाळले.हत्येला अपघाताचा बनावआसीफ खान यांची हत्या केल्यानंतर मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदी पात्रात फेकण्यात आला, त्यानंतर आसीफ खान यांची एमएच ०१ सीए १३३९ क्रमांकाची कार नदीत लोटण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र सदर कार चिखलात फसल्यामुळे ती नदीत लोटण्याचा प्रयत्न फसला. यातच हत्येचा अपघात बनविण्याचा डावही अयशस्वी ठरल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. या हत्याकांडानतर अपघात दाखविण्याचा बनाव सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

अमरावती जिल्ह्यातील आमला येथे केली हत्या!अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आमला या गावात ज्योती गणेशपुरे हिची बहीण रहिवासी आहे. याच ठिकाणी आसीफ खानला बोलावून आमला गावातच त्यांची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. ज्योती अनिल गणेशपुरे, वैभव अनिल गणेशपुरे व स्वप्निल नितीन वानखडे या तिघांसोबतच आणखी तीन आरोपींचा आसीफ खानच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचेही समोर आले आहे.कारमधील रक्ताचे नमुने घेतले!आसीफ खान यांची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांचीच एमएच ०१ सीए १३३९ क्रमांकाच्या कारमध्ये म्हैसांग येथील पूर्णा नदीवर आणण्यात आला. सदरचा मृतदेह एका चादरमध्ये गुंडाळून आणण्यात येत असताना आसीफ खानच्या रक्ताचे डाग कारमध्ये दोन ठिकाणी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, ते चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

रक्त नमुने जुळविण्यासाठी ‘डीएनए’चा पर्यायकारमध्ये आढळलेले रक्ताचे डाग हे आसीफ खानचेच आहेत का, यावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यासाठी आसीफ खान यांच्या कुटुंबीयातील व्यक्तीचे रक्त नमुने घेऊन डीएनए करण्याचा पर्याय पोलिसांकडे खुला असून, त्या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत; मात्र त्यापूर्वी मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

प्रतिकारातील चाकू जप्तआसीफ खान यांची गळा आवळून हत्या क रताना त्यांनी प्रतिकार केल्याची कबुली पोलिसांनी दिली. या प्रतिकारात आसीफ खानने चाकूने हल्ला केल्यामुळे ज्योती गणेशपुरे यांच्या गळ्यावर मोठी जखम झाली आहे, तर त्यांचा मुलगा वैभवही जखमी झाला आहे. सदरचा चाकू पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाMurderखून