शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

दहावीच्या निकालाच्या दृष्टीकोनातून ३४४ शाळांचे मूल्यांकन पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST

मूल्यमापनासाठी शिक्षण मंडळाने एक परिपत्रक तयार करून ते सर्व शाळांना पाठविले होते. मात्र, अनेक शाळांनी या परिपत्रकाचे नीट वाचन ...

मूल्यमापनासाठी शिक्षण मंडळाने एक परिपत्रक तयार करून ते सर्व शाळांना पाठविले होते. मात्र, अनेक शाळांनी या परिपत्रकाचे नीट वाचन केले नाही. त्यातील मुद्दे समजून घेतले नाहीत. अशी ओरड होत होती. परंतु अकोला जिल्ह्यातील जवळपास १०० टक्के शाळांनी मूल्यमापनाचा टप्पा पूर्ण केला आहे. परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून ४ जुलैपर्यंत त्याचा अहवाल शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात सुद्धा आला आहे. शिक्षण मंडळाचे मार्गदर्शन आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून जिल्ह्यातील दहावीच्या ३४४ शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकनाचे काम पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, त्यातही एकही त्रुटी आढळून आली नाही.

सर्वच शाळांचे मूल्यांकन पूर्ण!

जिल्ह्यात दहावीच्या एकूण ३४४ शाळा आहेत. त्यापैकी सर्वच शाळांनी मूल्यांकन पूर्ण करीत निकाल तयार करून तो बोर्डाकडे सादर केला. त्यामुळे मूल्यांकनाविना एकही शाळा जिल्ह्यात नाही.

मूल्यांकनातील चुका कोणी सुधारायच्या?

दहावीचा निकाल तयार करताना ८० गुणांच्या आधारावर तो तयार करायचा होता. पण काहींनी तो १०० गुणांच्या आधारावर तयार केला.

निकाल कसा तयार करायचा याच्या परिपत्रकाचे काही शाळेच्या शिक्षकांनी परिपूर्ण वाचन केले नाही, त्यामुळे त्यात त्रुटी आल्या. शिक्षण विभागाने निकाल कसा तयार करायचा यासाठी ऑनलाईन कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या.

शिक्षण मंडळाने दिलेल्या सूचना, परिपत्रकानुसार आणि माध्यमिक शिक्षण मंडळाने लक्ष घालून शाळांचे मूल्यांकन करण्यावर भर दिला. त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत. याकडे लक्ष दिले. त्यामुळेच जिल्ह्यातील दहावीच्या ३४४ शाळांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे.

-दिलीप तायडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक

कोरोनामुळे शाळा बंद होती. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. त्यामुळे शाळेने अंंतर्गत चाचणी, नववीतील गुण, दहावीतील चाचणींचे गुण व मूल्यमापन करून बोर्डाकडे निकाल दिला. १९३ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आम्ही बोर्डाकडे पाठविले. त्यात काही त्रुटी आढळून आल्या नाहीत.

-अरूण राऊत, मुख्याध्यापक जागृती विद्यालय

शिक्षण मंडळाने दिलेल्या परिपत्रकानुसार आम्ही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले. काही अडचणी आल्या. त्रुटी आढळल्या. परंतु शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनानुसार त्रुटी दूर केल्या. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून बोर्डाकडे दिले आहे. आता निकालाची प्रतीक्षा आहे.

-शत्रुघ्न बिरकड, मुख्याध्यापक जय बजरंग विद्यालय आळंदा

जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी

२६९७७

जिल्ह्यातील शाळा

३४४

मूल्यांकन झाले- ३४४

मूल्यांकन बाकी- ००