शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालाच्या दृष्टीकोनातून ३४४ शाळांचे मूल्यांकन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 10:50 IST

Education Sector News : जिल्ह्यात एकही शाळा मूल्याकंनाविना राहिली नाही.

अकोला : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांनी केलेल्या मूल्यांकनात त्रुटी आढळल्या आहेत. परंतु अकोला जिल्ह्यातील सर्व ३४४ शाळांनी दहावीतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून निकाल तयार केला आणि शिक्षण मंडळाकडे पाठविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकही शाळा मूल्याकंनाविना राहिली नाही.

मूल्यमापनासाठी शिक्षण मंडळाने एक परिपत्रक तयार करून ते सर्व शाळांना पाठविले होते. मात्र, अनेक शाळांनी या परिपत्रकाचे नीट वाचन केले नाही. त्यातील मुद्दे समजून घेतले नाहीत. अशी ओरड होत होती. परंतु अकोला जिल्ह्यातील जवळपास १०० टक्के शाळांनी मूल्यमापनाचा टप्पा पूर्ण केला आहे. परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून ४ जुलैपर्यंत त्याचा अहवाल शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात सुद्धा आला आहे. शिक्षण मंडळाचे मार्गदर्शन आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून जिल्ह्यातील दहावीच्या ३४४ शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकनाचे काम पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, त्यातही एकही त्रुटी आढळून आली नाही.

 

सर्वच शाळांचे मूल्यांकन पूर्ण!

जिल्ह्यात दहावीच्या एकूण ३४४ शाळा आहेत. त्यापैकी सर्वच शाळांनी मूल्यांकन पूर्ण करीत निकाल तयार करून तो बोर्डाकडे सादर केला. त्यामुळे मूल्यांकनाविना एकही शाळा जिल्ह्यात नाही.

मूल्यांकनातील चुका कोणी सुधारायच्या?

दहावीचा निकाल तयार करताना ८० गुणांच्या आधारावर तो तयार करायचा होता. पण काहींनी तो १०० गुणांच्या आधारावर तयार केला.

 

निकाल कसा तयार करायचा याच्या परिपत्रकाचे काही शाळेच्या शिक्षकांनी परिपूर्ण वाचन केले नाही, त्यामुळे त्यात त्रुटी आल्या. शिक्षण विभागाने निकाल कसा तयार करायचा यासाठी ऑनलाईन कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या.

 

शिक्षण मंडळाने दिलेल्या सूचना, परिपत्रकानुसार आणि माध्यमिक शिक्षण मंडळाने लक्ष घालून शाळांचे मूल्यांकन करण्यावर भर दिला. त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत. याकडे लक्ष दिले. त्यामुळेच जिल्ह्यातील दहावीच्या ३४४ शाळांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे.

-दिलीप तायडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक

कोरोनामुळे शाळा बंद होती. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. त्यामुळे शाळेने अंंतर्गत चाचणी, नववीतील गुण, दहावीतील चाचणींचे गुण व मूल्यमापन करून बोर्डाकडे निकाल दिला. १९३ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आम्ही बोर्डाकडे पाठविले. त्यात काही त्रुटी आढळून आल्या नाहीत.

-अरूण राऊत, मुख्याध्यापक जागृती विद्यालय

 

शिक्षण मंडळाने दिलेल्या परिपत्रकानुसार आम्ही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले. काही अडचणी आल्या. त्रुटी आढळल्या. परंतु शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनानुसार त्रुटी दूर केल्या. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून बोर्डाकडे दिले आहे. आता निकालाची प्रतीक्षा आहे.

-शत्रुघ्न बिरकड, मुख्याध्यापक जय बजरंग विद्यालय आळंदा

जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी

२६९७७

जिल्ह्यातील शाळा

३४४

मूल्यांकन झाले- ३४४

मूल्यांकन बाकी- ००

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र