शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

दीड दशकाची फलक लेखन परंपरा जोपासणारा 'अरूण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 09:17 IST

अरुण घोडसाड यांची पारखी व चिकित्सक नजर सतता बातम्यांचा शोध घेत असते, त्यामुळे ब-याचदा वर्तमानपत्रात न आलेल्या परंतु शहराच्या दुष्टीकोनात महत्त्वाच्या असलेल्या घडमोडी अरुण घोडसाड अचूकपणे टिपतात. त्यांच्या व्यवसायातून सवड काढून ते आपला आगळा-वेगळा छंद जोपासत आहे.

कारंजा (वाशिम), दि. 21 - वाटसरूंचे लक्षवेधून ते थबकतात व सबंध फलक लेखन वाचून काढतात व पुढे वाटचाल करतात. अनभिज्ञ अशा घटना उपयुक्त अशी माहिती ताज्या घडामोडी शहरातील वेंचक घटना यांची संवेदनशिल मनाने दखल घेउन आपल्या दुकानाजवळ लोकसेवेस्तव असलेल्या फलकावर वाचनीय, लोकोपयोगी मजकूर लिहितात. तसेच परिसरातील उल्लेखनिय प्रसंग, वार्ता लोकापर्यंत पोहोचविण्याचे काम कारंजा येथील अरूण घोडसाड दिड दशकापासून अविरत करीत आहेत.अरुण घोडसाड यांची पारखी व चिकित्सक नजर सतता बातम्यांचा शोध घेत असते, त्यामुळे ब-याचदा वर्तमानपत्रात न आलेल्या परंतु शहराच्या दुष्टीकोनात महत्त्वाच्या असलेल्या घडमोडी अरुण घोडसाड अचूकपणे टिपतात. त्यांच्या व्यवसायातून सवड काढून ते आपला आगळा-वेगळा छंद जोपासत आहे. घोडसाड हे महाराष्ट्र नाभिक संघाचे वाशिम जिल्हा सचिव आहेत. त्यांचा व्यवसाय केस कर्तनालयाचा आहे. फावल्या वेळात माहिती जमा करून स्वत: लेखन करतात. शहरातील विविध कार्यक्रमांचे आयोजन आज कुठे काय ? या शिर्षकातून ते फलकावर उमटवितात. त्यांना स्वत:ला वाचन व्यासंग असल्यामुळे संकलीत केलेल्या माहितीवर ते योग्य संस्कार करतात. बेरोजगारासाठी असलेल्या नोकरीच्या संधी, रेल्वेचे वेळापत्रक, सैन्य भरती, पोलीस भरती, व राजकीय महत्त्वाच्या बातम्या ते फलकावर लिहितात.

ते स्वत: माहिती जमवतात. लोकांकडून मिळवतात. त्या आधारे फलक लेखन करतात. त्यांच्या ग्राहकांना व सराफ लाईन मधून ये जा करणा-या वाटसरूना ही माहिती सहज वाचता येते. त्याच्या माहीती लेखनात स्पष्टता, निशंदिग्धता , अचुक्ता , सुगमता असल्यामुळे लोकांना सहज माहीतीचे आकलन होते. या फलक लेखनाचा एक भाग म्हणजे ते वाचकासाठी एक रोज नवीन सुविचार देतात. कोणत्याही जाती, पंथ, पक्ष ,भाषा याबद्दल आकस न ठेवता फलक लेखन करतात. हे त्यांच्या फलक लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या फलक लेखनाच्या कार्याबद्ल आमदार राजेंद्र पाटणी यांना आश्चर्य वाटले त्यांनी फलक लेखनाचे महत्त्व लक्षात घेउन लेखकाचे कौतुक केले. असे सजग नागरिक माज्या मतदार संघात आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.आपल्या फलक लेखनामुळे लोकांना महत्त्वाच्या घडामोडी कळतात. वाचकांच्या चेह-यावर उमटणारे आश्चर्य व समाधान आनंद देउन जाते.- अरुण घोडसाड