शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई!

By admin | Updated: May 19, 2014 20:17 IST

शेतकर्‍यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करून द्यावे, शेतकर्‍यांचे अकोला जिल्हाधिकार्‍यांना साकडे.

अकोला : यंदा मान्सून वेळेवर सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे; परंतु बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई भासवून अव्वाच्या सव्वा दराने बियाणे विकले जात आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करू न द्यावे, यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आज सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना साकडे घातले.

     मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मूग,ज्वारीसह सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनचे झाले होते. रब्बी पिकेही अवकाळी पावसाने ध्वस्त केली. यामुळे आर्थिक परिस्थितीला तोंड देत असताना यावर्षी सोयाबीन बियाण्याचे भाव वाढल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. बाजरात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. महाबीजच्या सभासद शेतकर्‍यांनी महाबीजला ४० ते ४५ रुपये प्रती किलोने सोयाबीन बियाणे विकले. तथापि, तेच बियाणे शेतकर्‍यांना आता ७५ रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील सोयाबीन सुरुवातीला अडीच हजार रुपये प्रती क्विंटल विकले आहे. तथापि, शेतकर्‍यांना केवळ ३० किलो बियाण्यांचा बॅगसाठी तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. शेतकर्‍यांची ही लूट थांबविण्यासाठी कृषी अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा यंदा शेतकर्‍यांना जमिनी पडीत ठेवाव्या लागतील. या संदर्भात सोमवारी शेकडो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना साकडे घातले व एक निवेदनही सादर केले.

      यावर जिल्हा कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी सोयाबीनचे ३५ ते ४० हजार क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध आहे. दर एमआरपीनुसार आहेत; परंतु कोणी जास्त भावाने बियाणे विकत असेल तर त्या कृषी सेवा केंद्राचे अधिकृत नाव द्यावे किंवा तशी पावती आणावी, त्यावर लगेच कारवाई केल जाईल, असे आश्‍वासन दिले.