शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई!

By admin | Updated: May 19, 2014 20:17 IST

शेतकर्‍यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करून द्यावे, शेतकर्‍यांचे अकोला जिल्हाधिकार्‍यांना साकडे.

अकोला : यंदा मान्सून वेळेवर सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे; परंतु बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई भासवून अव्वाच्या सव्वा दराने बियाणे विकले जात आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करू न द्यावे, यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आज सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना साकडे घातले.

     मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मूग,ज्वारीसह सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनचे झाले होते. रब्बी पिकेही अवकाळी पावसाने ध्वस्त केली. यामुळे आर्थिक परिस्थितीला तोंड देत असताना यावर्षी सोयाबीन बियाण्याचे भाव वाढल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. बाजरात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. महाबीजच्या सभासद शेतकर्‍यांनी महाबीजला ४० ते ४५ रुपये प्रती किलोने सोयाबीन बियाणे विकले. तथापि, तेच बियाणे शेतकर्‍यांना आता ७५ रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील सोयाबीन सुरुवातीला अडीच हजार रुपये प्रती क्विंटल विकले आहे. तथापि, शेतकर्‍यांना केवळ ३० किलो बियाण्यांचा बॅगसाठी तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. शेतकर्‍यांची ही लूट थांबविण्यासाठी कृषी अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा यंदा शेतकर्‍यांना जमिनी पडीत ठेवाव्या लागतील. या संदर्भात सोमवारी शेकडो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना साकडे घातले व एक निवेदनही सादर केले.

      यावर जिल्हा कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी सोयाबीनचे ३५ ते ४० हजार क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध आहे. दर एमआरपीनुसार आहेत; परंतु कोणी जास्त भावाने बियाणे विकत असेल तर त्या कृषी सेवा केंद्राचे अधिकृत नाव द्यावे किंवा तशी पावती आणावी, त्यावर लगेच कारवाई केल जाईल, असे आश्‍वासन दिले.