शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अकोला जिल्ह्यातील ६४२ जणांकडे शस्त्र परवाना; १०० वर शस्त्र जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 13:37 IST

अकोला : जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना असलेल्या जिल्ह्यातील ६४२ जणांकडे शस्त्र परवाना असून, यापैकी १०० वर परवानाधारकांनी त्यांचे शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यात जमा केले आहे.

- सचिन राऊत

अकोला : जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना असलेल्या जिल्ह्यातील ६४२ जणांकडे शस्त्र परवाना असून, यापैकी १०० वर परवानाधारकांनी त्यांचे शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यात जमा केले आहे. ५०० वर परवानाधारकांनी अद्यापही शस्त्र जमा केले नसून त्यांचे शस्त्र तातडीने जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. हे शस्त्र जमा करण्यासाठी अंतिम मुदत १८ मार्च देण्यात आली असून, प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया जलद करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांकडून त्यांचे शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी आदेश देण्यात आला आहे. शेतातील पिकांचे संरक्षण, आर्थिक आणि वैयक्तीक सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाने पिस्तुल, रिव्हॉल्वर आणि दुबार बंदुकीचे परवाने देण्यात येतात. हा परवाना देण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक यांचे नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. गृह विभागाने ठरविलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करणाऱ्यांना जिल्हाधिकाºयांकडून शस्त्र परवाना देण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात सध्या ६४२ जणांना शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच बळजबरी होऊ नये, यासाठी परवानाधारकांकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात येतात. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शस्त्र जमा करण्यासाठी आदेश दिला असून, प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १०० वर शस्त्र जमा करण्यात आली आहेत, तर १८ मार्चपर्यंत ही शस्त्र जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच ही शस्त्रे संबंधिताना परत केली जाणार आहेत. राजकीय नेत्यांची ठाण्यात नोंदराजकीय नेत्यांकडे स्वसुरक्षेसाठी असलेले शस्त्र जमा करायचे नसेल तर संबंधित नेत्यांसाठी एक वेगळी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नेत्याला ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जायचे आहे, त्या पोलीस ठाण्यात नोंद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे निवडणूक काळातही शस्त्र बाळगायचे असल्यास शर्थीचे पालन करणे बंधनकारक आहे. परवाना रद्दसाठी द्वीसदस्यीस समितीशस्त्र परवाना देण्यासाठी जिल्हाधिकाºयांचा आदेश महत्त्वाचा आहे. तर तो रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची द्वीसदस्यीय समिती निर्णय घेते. आत्मसंरक्षणार्थ बाळगण्याच्या एका प्रकरणात गणेश ऊर्फ भाई तिलवे विरुद्ध जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व इतर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये ठरलेल्या मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्यानंतरच राज्य सरकारने परवाने द्यावे, असे निर्देश दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस