शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोला जिल्ह्यातील ६४२ जणांकडे शस्त्र परवाना; १०० वर शस्त्र जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 13:37 IST

अकोला : जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना असलेल्या जिल्ह्यातील ६४२ जणांकडे शस्त्र परवाना असून, यापैकी १०० वर परवानाधारकांनी त्यांचे शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यात जमा केले आहे.

- सचिन राऊत

अकोला : जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना असलेल्या जिल्ह्यातील ६४२ जणांकडे शस्त्र परवाना असून, यापैकी १०० वर परवानाधारकांनी त्यांचे शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यात जमा केले आहे. ५०० वर परवानाधारकांनी अद्यापही शस्त्र जमा केले नसून त्यांचे शस्त्र तातडीने जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. हे शस्त्र जमा करण्यासाठी अंतिम मुदत १८ मार्च देण्यात आली असून, प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया जलद करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांकडून त्यांचे शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी आदेश देण्यात आला आहे. शेतातील पिकांचे संरक्षण, आर्थिक आणि वैयक्तीक सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाने पिस्तुल, रिव्हॉल्वर आणि दुबार बंदुकीचे परवाने देण्यात येतात. हा परवाना देण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक यांचे नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. गृह विभागाने ठरविलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करणाऱ्यांना जिल्हाधिकाºयांकडून शस्त्र परवाना देण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात सध्या ६४२ जणांना शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच बळजबरी होऊ नये, यासाठी परवानाधारकांकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात येतात. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शस्त्र जमा करण्यासाठी आदेश दिला असून, प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १०० वर शस्त्र जमा करण्यात आली आहेत, तर १८ मार्चपर्यंत ही शस्त्र जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच ही शस्त्रे संबंधिताना परत केली जाणार आहेत. राजकीय नेत्यांची ठाण्यात नोंदराजकीय नेत्यांकडे स्वसुरक्षेसाठी असलेले शस्त्र जमा करायचे नसेल तर संबंधित नेत्यांसाठी एक वेगळी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नेत्याला ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जायचे आहे, त्या पोलीस ठाण्यात नोंद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे निवडणूक काळातही शस्त्र बाळगायचे असल्यास शर्थीचे पालन करणे बंधनकारक आहे. परवाना रद्दसाठी द्वीसदस्यीस समितीशस्त्र परवाना देण्यासाठी जिल्हाधिकाºयांचा आदेश महत्त्वाचा आहे. तर तो रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची द्वीसदस्यीय समिती निर्णय घेते. आत्मसंरक्षणार्थ बाळगण्याच्या एका प्रकरणात गणेश ऊर्फ भाई तिलवे विरुद्ध जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व इतर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये ठरलेल्या मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्यानंतरच राज्य सरकारने परवाने द्यावे, असे निर्देश दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस