शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अर्चनाचा आनंद अल्पजीवी

By admin | Updated: July 10, 2017 02:40 IST

शर्यतीतून अपात्र ठरवल्याने तिचे सुवर्णपदक काढून श्रीलंकेच्या निमाली कोंडा हिला देण्यात आले. त्यामुळे सुवर्णपदकाचा अर्चनाचा आनंद अल्पजीवी ठरला.

भुवनेश्वर : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका येथील दानापूर गावाची रहिवासी पुणे क्रीडा प्रबोधिनीची धावपटू अर्चना आढावने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला खरा, परंतु तांत्रिक समितीने तिला शर्यतीतून अपात्र ठरवल्याने तिचे सुवर्णपदक काढून श्रीलंकेच्या निमाली कोंडा हिला देण्यात आले. त्यामुळे सुवर्णपदकाचा अर्चनाचा आनंद अल्पजीवी ठरला.महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयांतर्गत १९९६ मध्ये स्थापन झालेल्या क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूने वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती आणि ही कामगिरी अर्चना आढावने केली होती. रविवारी महाराष्ट्राच्या अर्चना आढावने ८00 मी. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देशाचा गौरव वाढविला होता, पण हा तिचा आनंद जास्त वेळ टिकलाच नाही. २१ वर्षीय अर्चनाला सुवर्णपदकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली होती. श्रीलंकेच्या निमाली वालिवर्षा कोंडा हिच्याकडून तिला सुरुवातीपासूनच कडवी झुंज मिळत होती. अंतिम रेषा पार करताना अर्चनाने २ मिनिटे ५ सेकंदाची वेळ नोंदविली होती. तर निमालीने २ मिनिटे ०५.२३ सेकंदात फिनिश लाईन गाठली होती. अर्चनाला केवळ 0.२३ सेकंदाच्या फरकाने सुवर्णपदक मिळाले होते. नंतर निमालीच्या मार्गदर्शकांनी अंतिम रेषेजवळ अर्चनाने निमालीला धक्का मारल्याचा आक्षेप नोंदविला होता. तांत्रिक समितीने तो आक्षेप व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहून अर्चनाला दोषी मानून तिचे सुवर्णपदक काढून घेतले. त्यानंतर भारतीय संघाच्या व्यवस्थापकाने अर्चनाविरुद्ध दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असा अर्ज दिला. परंतु ज्युरीने स्पष्ट सांगितले, की हा सर्वानुमते घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे २ मिनिटे ०५.२३ सेकंद वेळ नोंदविलेल्या निमालीला सुवर्णपदक देण्यात आले. श्रीलंकेच्याच गयांतिका थुशारी हिला २ मिनिटे ५.२७ सेकंदाच्या वेळेमुळे रौप्य तर जपानच्या फुमिका ओमोरीला कांस्यपदक देण्यात आले. अर्चनाचे सुवर्णपदक काढून घेणे हे तिच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे. ८०० मीटरच्या पुढे जेवढ्या शर्यतीत होतात त्या सर्वांमध्ये लेनची शिस्त नसते त्यामुळे धावपटूंचा एकमेकांना धक्का हा लागतोच. पण या शर्यतीत जो काही निर्णय दिला गेला त्यानुसार अर्चनाकडून कोठे तरी चूक झाली असेल. पण या स्पर्धेसाठी तिने घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तिची आत्तापर्यंतची कामगिरी पाहता आशियाई महासंघ आणि भारतीय महासंघ तिच्या जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने नक्कीच विचारविनिमय करतील असा विश्वास वाटतो.- सुरेश काकड, मार्गदर्शक, क्रीडा प्रबोधिनीसुवर्णपदक काढून घेणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तिने या स्पर्धेसाठी खूप कष्ट घेतले होते. तिने या प्रकरणाने खचून न जाता पुढील स्पर्धेत चांगली कामगिरी करावी अशी शुभेच्छा! शासन व क्रीडा खाते सदैव तिच्या पाठीशी राहील. तिची या स्पर्धेतील कामगिरी पाहता अ‍ॅथलेटिक्स महासंघ पुढील स्पर्धेसाठी प्रयत्नशील राहतील असे वाटते.- नरेंद्र सोपल, सहसंचालक, क्रीडा विभाग