शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अनुकंपाधारकांना लवकरच नियुक्ती

By admin | Updated: April 18, 2017 01:49 IST

उमेदवारांसह सदस्या चोरे यांची सीईओंशी चर्चा

अकोला : शासनाने भरतीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतरही जिल्हा परिषदेत अनुकंपाधारकांना नियुक्ती देण्याला प्रचंड विलंब करण्यात आला. त्यामुळे दरवर्षी अनुकंपाधारक उमेदवारांची २००५ नंतरची प्रतीक्षा वाढतच गेली. त्यामुळे समस्याग्रस्त अनुकंपाधारकांंनी जिल्हा परिषद सदस्या जोत्स्ना चोरे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी पंचायत राज समितीचा दौरा आटोपल्यानंतर तातडीने नियुक्ती देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शासकीय सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या पाल्यांना सेवेत घेण्याची नियमात तरतूद आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची ज्येष्ठता यादी तयार केली जाते. यादीतील ज्येष्ठतेने उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेतले जाते. २००५ पूर्वी अनुकंपाधारकांना कोणत्याही अटीशिवाय सेवेत सामावून घेण्यात आले. त्यासाठी रिक्त पदांच्या संख्येच्या टक्केवारीची अटही नव्हती. २२ आॅगस्ट २००५ रोजीच्या शासन निर्णयाने अनुकंपाधारकांच्या पदभरतीवर मर्यादा आल्या. एकूण रिक्त पदांच्या पाच टक्के अनुकंपाधारकातून भरावे, या अटीने उमेदवारांची गोची केली. जिल्हा परिषदेने २००९ पर्यंत रिक्त पदांच्या पाच टक्केप्रमाणे भरती केली. त्यानंतर शासनाने नोकर भरतीवरच निर्बंध आणले. २०१० ते २०१२ या काळात भरतीच झाली नाही. या प्रकाराने अनुकंपाधारकांचा मोठा अनुशेष निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी शासनाने १ मार्च २०१४ रोजी रिक्त पदांच्या दहा टक्के पदे अनुकंपाधारक उमेदवारांतून भरण्याचे निर्देश दिले. मात्र, २०१२ ते आतापर्यंत भरती प्रक्रियाच न झाल्याने जिल्ह्यात जवळपास १३८ अनुकंपाधारकांना नोकरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेत गेल्या अनेक दिवसांपासून चकरा मारणे सुरूच ठेवले. सोमवारी जिल्हा परिषद सदस्या चोरे यांच्यासह त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अनुकंपाधारकांना पंचायत राज समितीचा दौरा आटोपताच नियुक्ती दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. शिक्षण विभागाची माहिती अद्यापही नाही!अनुकंपाधारकांना नियुक्ती मिळण्यासाठी रिक्त जागांची संख्या निश्चित होणे आवश्यक आहे. त्यासाठी इतर सर्व विभागातील माहिती मिळाली. मात्र, शिक्षण विभागाची संपूर्ण माहिती अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे हा विभाग वगळून भरती सुरू करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.