शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पातूर तालुक्यातील रोहयो कामांच्या तपासणीसाठी दहा पथकांची नियुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:20 IST

दहा विशेष तपासणी पथकांसह ही चौकशी वेळेत पूर्ण करण्यासाठी चार सनियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पातूर तालुक्यात ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने, पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या रोहयो कामांची सखोल तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी २९ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार दहा विशेष तपासणी पथकांसह ही चौकशी वेळेत पूर्ण करण्यासाठी चार सनियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील पातूर तालुक्यात रोहयोच्या कामांत अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे काही प्रकरणात निदर्शनास आल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिली होती. तसेच पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या रोहयो कामांची विशेष तपासणी पथकाकडून सखोल तपासणी करण्याची विनंतीही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार पातूर तालुक्यात १ एप्रिल २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या रोहयो कामांची सखोल तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी २९ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येकी तीन सदस्यांचा समावेश असलेल्या दहा विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांत अकोला जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांतील अधिकारी, कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यामध्ये पथक प्रमुख म्हणून तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि सदस्य म्हणून पंचायत समितीचे कृषी अधिकारी, सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता तसेच तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनांचा समावेश आहे. यासोबतच या कामांची तपासणी वेळेत पूर्ण करण्यासाठी वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार, कार्यकारी अभियंता डी. पी. गव्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक, लेखाधिकारी जी. एम. चौधरी इत्यादी चार सनियंत्रण अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूर