शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

ऐन हंगामात बाजार समित्या प्रभावित

By admin | Updated: November 17, 2014 01:41 IST

प्रशासकाला मूळ कामे सांभाळून द्यावी लागणार सेवा.

विवेक चांदूरकर/अकोला

            ऐन हंगामाच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात आल्या असून, शासकीय प्रशासक बसविण्यात आला आहे. मात्र, या प्रशासकांकडे सहाय्यक निबंधक पदाचीही जबाबदारी राहणार असल्याने बाजार समितीतील कामे प्रभावित होणार आहेत. शेतकरी शेतमाल तारण ठेवतात. पैशांचा व्यवहाराच्या वेळी प्रशासकांची उपस्थिती नसली तर त्यामध्ये खोळंबा येऊ शकतो. तसेच शेतकर्‍यांना, हमाल, कामगारांना अडचणी आल्या तर कुणाकडे मांडाव्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नव्या सरकारने राज्यातील २00 बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. मात्र, नवीन निवडणुकीची घोषणा केलेली नाही. शासनाने निबंधक कार्यालयात पाठविलेल्या आदेशामध्ये बाजार समितीतील संचालक मंडळ बरखास्त करून निवडणुका घेण्याचे म्हटले आहे. त्यानुसार अकोला, बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर आणि पातूर या चार बाजार समित्यांवर प्रशासकांची नव्याने नेमणूक करण्यात आली. अकोला बाजार समितीच्या प्रशासकपदाची सूत्रे पातूरचे सहायक तालुका निबंधक ए.डी. डोंगरे यांच्याकडे सोपविली आहेत. मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर डी. आर. पिंजरकर, बाश्रीटाकळी बाजार समितीच्या प्रशासकपदी ओ. एस. साळुंखे, तर पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदाची सूत्रे आर. आर. विटणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. अकोला बाजार समितीत कोट्यवधी रुपयांचा शेतमाल तारण ठेवण्यात येतो. शेतकर्‍यांना भाड्याने वाहने करून शेतमाल तारण ठेवायला आणावा लागतो. अशावेळी प्रशासक नसल्यामुळे त्यांना दुसर्‍या दिवशी बोलाविले तर अकारण जास्तीचा भुर्दंड पडू शकतो. सध्या बाजार समितीत सोयाबीनसोबतच, तूर, ज्वारी मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. दररोज हजारो क्विंटल शेतमाल येत असल्यामुळे बाजार समितीत गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मालाला कमी भाव मिळाला, व्यापार्‍यांनी फसवणूक केली तर सभापती किंवा प्रशासकाकडे शेतकरी दाद मागतो. मात्र, प्रशासक नसला तर शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागतो.