शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संताप, पीकविमा कार्यालयाची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 16:06 IST

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

अकोला - राज्यात एकीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध नोंदवत विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, दुसरीकडे अकोल्यात स्थानिक शिवसेना नेते पीकविमा न मिळाल्याने संताप व्यक्त करत आहेत. त्यातूनच पीकविमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेला घास पाण्यात वाहून गेला. सोयाबीन शेतीचही मोठं नुकसान झालं होतं. मात्र, अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तर, पीकविम्याचे पैसेही खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यामुळेच, अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाने कार्यालयाची तोडफोड करत संताप व्यक्त केला.

अकोला जिल्ह्यातल्या मुर्तीजापुर येथे ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पीकविमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पिक विमा न मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केली. शिवसेना तालुकाप्रमुख तथा मा.जि.प.सदस्य अप्पू तिडके यांनी यावेळी सरकारचा निषेध नोंदवला. तसेच, शेतकऱ्यांप्रती हे सरकार संवदेनशील नसल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाCrop Insuranceपीक विमाAkolaअकोला