शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अंगणवाडीचा ठराव शासनाकडे सादर; मनपाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 13:48 IST

अकोला: महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, या उद्देशातून सुरू केलेल्या बालवाड्या बंद करून त्याऐवजी आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या शहरातील सर्व अंगणवाड्यांचे स्थानांतरण मनपा शाळांमध्ये केले जाणार आहे.

ठळक मुद्दे मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये बालवाडी सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडी सुरू करत, त्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. सेविकांना तीन हजार रुपये, तर मदतनीस यांना एक हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

- आशिष गावंडे

अकोला: महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, या उद्देशातून सुरू केलेल्या बालवाड्या बंद करून त्याऐवजी आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या शहरातील सर्व अंगणवाड्यांचे स्थानांतरण मनपा शाळांमध्ये केले जाणार आहे. यासंदर्भात सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला ठराव महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्तांकडे सादर केला आहे. येत्या एक-दोन दिवसांत त्यावर निर्णय होणार असल्याने मनपा प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.महापालिकेच्या शाळांमध्ये बालवाडी नसल्यामुळे पटसंख्या वाढीसाठी विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबवताना दमछाक होत असल्याचा गवगवा शिक्षकांकडून नेहमीच केला जातो. पटसंख्येत वाढ होत नसल्याने मनपा शाळांवर समायोजनाची परिस्थिती ओढवली. समाजातील गोरगरीब कुटुंबांना महागड्या कॉन्व्हेंटचा खर्च परवडणारा नसल्यामुळे मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये बालवाडी सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडी सुरू करत, त्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. सेविकांना तीन हजार रुपये, तर मदतनीस यांना एक हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरुवातीला मानधनावर का असेना, नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीला उड्या मारणाऱ्या व ‘लॉबिंग’ करणाºया सेविकांसह काही मदतनिसांनी रुजू होण्याचा आदेश घेऊनही मनपाच्या बालवाड्यांकडे सपशेल पाठ फिरवल्याची परिस्थिती होती. यादरम्यान, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्तांनी बालवाडी व त्यांच्या अखत्यारित असणाºया अंगणवाडीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. मनपा प्रशासनाने शहरातील सुमारे १८० अंगणवाडीसाठी वर्ग खोल्या उपलब्ध करून दिल्यास मनपाचा आर्थिक भार कमी होण्यासोबतच अंगणवाडीतील विद्यार्थी पुढील पहिल्या वर्गासाठी मनपा शाळेत सहज प्रवेश घेऊ शकतील. यामुळे मनपा शाळांची पटसंख्या कायम राहण्यासोबतच शासनाचा उद्देशही सफल होण्यास मदत होणार आहे. ही बाब ध्यानात घेता सर्वसाधारण सभेत या विषयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. तसा ठराव प्रशासनाने शासनाकडे सादर केला असून, त्याला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

सेविका, मदतनीस यांचा नियुक्ती कार्यकाळ संपुष्टातमनपा प्रशासनाने बालवाडीसाठी मानधन तत्त्वावर नियुक्त केलेल्या सेविका व मदतनीस यांचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपुष्टात आला. तरीही आपल्याला पुनर्नियुक्ती देण्यात यावी, यासाठी बालवाडी सुरू ठेवण्याची विचित्र मागणी काही सेविकांकडून सुरू झाली आहे.

शहरातील अंगणवाड्यांचे मनपा शाळेत स्थानांतरण केल्यास विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा मूळ उद्देश सफल होणार आहे. शिवाय मनपावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.-जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका