शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अन् आयटीआयमध्ये प्रवेशाची झाली पंचाईत..!

By admin | Updated: June 12, 2015 17:48 IST

कर्मचा-यांची झाली धावपळ; आयटीआयमधील प्रकार.

अकोला : दहावी, बारावीचा निकाल नुकताच लागल्याने ग्रामीण भागासह शहरातील अनेक विद्यार्थी आयटीआयच्या प्रवेशासाठी धावपळ करीत आहेत. सध्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना मध्येच इंटरनेट पॅक संपल्याने सर्फिं गची गती मंदावली अन् विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पंचाईत झाली. हा प्रकार गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास येथील आयटीआयमध्ये घडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कर्मचार्‍यांमध्ये एकच धावपळ झाली. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी शासनाने आयटीआय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आयटीआय प्रवेश अर्ज इतर ठिकाणांहूनदेखील करता येतो. तथापि, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील आयटीआय केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्या आनुषंगाने शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी गुरुवार, ११ जून रोजी आयटीआयमध्ये गर्दी केली होती. ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू असताना अचानक इंटरनेट सर्फिंगची गती मंदावली. त्यामुळे विद्यार्थ्यांंंना ताटकळत बसावे लागले. दुसरीकडे महिन्याच्या प्रारंभीच अचानक इंटरनेटचा नेट पॅक संपल्याने आयटीआय कर्मचार्‍यांमध्ये धावपळ झाली. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आयटीआयच्या दोन कर्मचार्‍यांनी बी.एस.एन.एल. कार्यालय गाठले. महिनाभर पुरणारे नेट पॅक दहा दिवसांतच संपल्याने अज्ञाताकडून त्याची चोरी होत असावी, असा अंदाज आयटीआयमार्फत लावण्यात आला; परंतु नेट पॅकला पासवर्ड असल्याने त्याची चोरी होऊ शकत नसल्याचे टेलिफोन कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगीतले तसेच आयटीआयमध्येच इंटरनेटचा उपयोग झाल्याने नेट पॅक संपल्याचेदेखील टेलिफोन कंपनीमार्फत सांगण्यात आले. तेव्हा आयटीआयमधील नेट पॅक संपवणारा तो कोण, याचे गूढ कायम आहे.