शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

निधीअभावी रखडला अमरावती-सुरत महामार्ग; आ. बाजोरियांची लक्षवेधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:20 IST

अकोला: अमरावती ते सुरतपर्यंतच्या महामार्गाचे काम अचानक ठप्प पडले असून, रस्त्यालगतचा भाग खोदून ठेवण्यात आल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

अकोला: अमरावती ते सुरतपर्यंतच्या महामार्गाचे काम अचानक ठप्प पडले असून, रस्त्यालगतचा भाग खोदून ठेवण्यात आल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. शासकीय यंत्रणांच्या उदासीन धोरणामुळे निष्पाप वाहनधारकांचे हकनाक बळी जात असल्याचा मुद्दा शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला असता, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लेखी उत्तर देताना सारवासारव करावी लागली. तूर्तास निधी नसल्यामुळे महामार्गाचे काम रखडल्याचे ना. पाटील यांनी स्पष्ट केले.अमरावती-सुरत महामार्गाचे चौपदरीकरण होत असून, त्याची मुदत २०१९ मध्ये संपणार आहे. असे असताना आजपर्यंत कंत्राटदाराने महामार्गाचे केवळ २५ टक्के काम केले असून, मागील काही महिन्यांपासून कामही बंद आहे. अशा परिसस्थितीत हा महामार्ग कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आ. बाजोरिया यांनी उपस्थित केला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नाच्या लेखी उत्तरात निधीची कमतरता असल्याचे मान्य केले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हे काम करीत आहे. अमरावती ते चिखलीपर्यंतच्या १९४ किमीपैकी २५ टक्के काम पूर्ण झाले असून, आयएल अ‍ॅन्ड एफएस कंपनीच्या आर्थिक अडचणीमुळे सदर काम थांबल्याचे ना. चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले. चिखली ते फागणे (गुजरात) या १५० किमी टप्प्यापैकी केवळ १५ टक्के काम पूर्ण झाले असून, या कामातही आर्थिक अडचण असल्याचे प्राधिकरण अधिकाऱ्यांनी कळवले आहे. तथापि, हे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे ना. पाटील यांनी नमूद केले.उनखेड येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय कधी?मूर्तिजापूर तालुक्यातील उनखेड येथील शेतकऱ्यांना २०१३ च्या सुधारित भूसंपादन कायद्यानुसार वाढीव मोबदला दिला नसून, प्रकल्प बाधित प्रमाणपत्रेसुद्धा दिली नाहीत. ठरल्यानुसार नदी पात्रात सिमेंट रस्ता बांधला नसल्याने शेतकºयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शासन येथील शेतकºयांना कधी न्याय देणार, असा सवाल आ. बाजोरिया यांनी उपस्थित केला. त्यावर २९ मार्च २०१९ पासून उमा नदीच्या खोलीकरणाला प्रारंभ झाला असून, ३ मार्चपासून उनखेड येथील पूर संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शासनाच्या निकषानुसार बाधित शेतकºयांना मोबदला दिल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाVidhan Parishadविधान परिषद