शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

निधीअभावी रखडला अमरावती-सुरत महामार्ग; आ. बाजोरियांची लक्षवेधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:20 IST

अकोला: अमरावती ते सुरतपर्यंतच्या महामार्गाचे काम अचानक ठप्प पडले असून, रस्त्यालगतचा भाग खोदून ठेवण्यात आल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

अकोला: अमरावती ते सुरतपर्यंतच्या महामार्गाचे काम अचानक ठप्प पडले असून, रस्त्यालगतचा भाग खोदून ठेवण्यात आल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. शासकीय यंत्रणांच्या उदासीन धोरणामुळे निष्पाप वाहनधारकांचे हकनाक बळी जात असल्याचा मुद्दा शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला असता, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लेखी उत्तर देताना सारवासारव करावी लागली. तूर्तास निधी नसल्यामुळे महामार्गाचे काम रखडल्याचे ना. पाटील यांनी स्पष्ट केले.अमरावती-सुरत महामार्गाचे चौपदरीकरण होत असून, त्याची मुदत २०१९ मध्ये संपणार आहे. असे असताना आजपर्यंत कंत्राटदाराने महामार्गाचे केवळ २५ टक्के काम केले असून, मागील काही महिन्यांपासून कामही बंद आहे. अशा परिसस्थितीत हा महामार्ग कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आ. बाजोरिया यांनी उपस्थित केला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नाच्या लेखी उत्तरात निधीची कमतरता असल्याचे मान्य केले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हे काम करीत आहे. अमरावती ते चिखलीपर्यंतच्या १९४ किमीपैकी २५ टक्के काम पूर्ण झाले असून, आयएल अ‍ॅन्ड एफएस कंपनीच्या आर्थिक अडचणीमुळे सदर काम थांबल्याचे ना. चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले. चिखली ते फागणे (गुजरात) या १५० किमी टप्प्यापैकी केवळ १५ टक्के काम पूर्ण झाले असून, या कामातही आर्थिक अडचण असल्याचे प्राधिकरण अधिकाऱ्यांनी कळवले आहे. तथापि, हे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे ना. पाटील यांनी नमूद केले.उनखेड येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय कधी?मूर्तिजापूर तालुक्यातील उनखेड येथील शेतकऱ्यांना २०१३ च्या सुधारित भूसंपादन कायद्यानुसार वाढीव मोबदला दिला नसून, प्रकल्प बाधित प्रमाणपत्रेसुद्धा दिली नाहीत. ठरल्यानुसार नदी पात्रात सिमेंट रस्ता बांधला नसल्याने शेतकºयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शासन येथील शेतकºयांना कधी न्याय देणार, असा सवाल आ. बाजोरिया यांनी उपस्थित केला. त्यावर २९ मार्च २०१९ पासून उमा नदीच्या खोलीकरणाला प्रारंभ झाला असून, ३ मार्चपासून उनखेड येथील पूर संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शासनाच्या निकषानुसार बाधित शेतकºयांना मोबदला दिल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाVidhan Parishadविधान परिषद