शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक उपस्थिती पद्धतीतून अमरावती, लातूर विभाग वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 14:51 IST

शिक्षण विभागाने अमरावती व लातूर विभागात विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती लागू केली नसल्याचा आरोप कनिष्ठ महाविद्यालय संचालकांनी केला आहे.

ठळक मुद्देआपल्या क्लासमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला स्वत:च्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास बाध्य केले जाते. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत शिकणाºया विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरू केली. विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिकांना कमी अन् क्लासेसमध्ये अधिक उपस्थित असतात.

- नितीन गव्हाळे

अकोला: राज्य शासनाने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी तासिका हजेरी लावावी, या उद्देशाने मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या विभागात कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु यातून शासनाने अमरावती आणि लातूर विभाग वगळल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वाधिक कोचिंग क्लासेस अमरावती आणि लातूर विभागात आहेत. त्यांच्या दबावातूनच शिक्षण विभागाने अमरावती व लातूर विभागात विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती लागू केली नसल्याचा आरोप कनिष्ठ महाविद्यालय संचालकांनी केला आहे.विज्ञान शाखेचे विद्यार्थी केवळ नावाला इयत्ता अकरावीत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. या ठिकाणी उपस्थिती बंधनकारक नसल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिकेला हजेरी न लावता, केवळ कोचिंग क्लासेसच्या शिक्षणावर भर देतात. त्यामुळे राज्यात सर्वत्रच कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थी संख्येअभावी ओस पडली आहेत. एवढेच नाही तर अनेक कोचिंग क्लासेस संचालकांनी स्वत:चे स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालये सुरू केली. त्यामुळे आपल्या क्लासमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला स्वत:च्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास बाध्य केले जाते. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी तर खासगी कोचिंग क्लासेस वर्गांसोबत सामंजस्य करार केल्याचेसुद्धा शासनानेच म्हटले आहे. विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिका नियमित हजर राहत नसल्यामुळे शासनाने अमरावती व लातूर विभाग वगळून राज्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत शिकणाºया विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरू केली. शासनाने कोचिंग क्लासेसचा दाखला देत, हा निर्णय घेतला खरा; परंतु ज्या अमरावती व लातूर विभागात सर्वाधिक कोचिंग क्लासेस आहेत, त्याच विभागाला बायोमेट्रिक उपस्थितीतून शासनाने कसे काय वगळले, याचेच कनिष्ठ महाविद्यालय संचालकांना आश्चर्य वाटत आहे. शासनाने स्वत:च्याच निर्णयाला हरताळ फासला आहे. शासनाने हे दोन्ही विभाग जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप शिक्षक संघटना, कनिष्ठ महाविद्यालय संचालकांनी केला आहे.अमरावती विभागात बायोमेट्रिक पद्धत हवीच!बायोमेट्रिक पद्धतीतून वगळलेल्या अमरावती विभागात सर्वाधिक कोचिंग क्लासेस अकोला, अमरावती शहरांमध्ये आहेत. लातूर विभागातसुद्धा लातूर, परभणी, नांदेड शहरामध्ये सर्वाधिक कोचिंग क्लासेस आहे. त्यामुळे या भागासाठी बायोमेट्रिक पद्धत अत्यंत गरजेची होती. येथील कोचिंग क्लासेसमुळे कनिष्ठ महाविद्यालये केवळ प्रवेशापुरती उरली आहेत. विद्यार्थी महाविद्यालयांमधील तासिकांना कमी अन् क्लासेसमध्ये अधिक उपस्थित असतात. त्यामुळे अमरावती विभागात बायोमेट्रिक पद्धत हवीच. 

शासनाने सर्वच विभागात विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक पद्धती लागू केली; परंतु यातून अमरावती व लातूर विभाग वगळून शासनाला काय साध्य करायचे आहे? महत्त्वाचे सर्वाधिक शिकवणी वर्ग याच भागात आहेत. महाविद्यालयांमध्ये तासिका नियमित झाल्या तर गरीब विद्यार्थ्यांना फायदा होईल. गरीब विद्यार्थी शिकवणी वर्गाची महागडी फीस भरू शकत नाहीत.प्रा. विवेक डवरे, अध्यक्ष, आदर्श महाविद्यालय. 

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिक