शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

अमरावती विभागातील धरणांमध्ये ६0 टक्के पाणीसाठा शिल्लक!

By admin | Updated: November 24, 2015 01:40 IST

२0१३ च्या तुलनेत ३२ टक्क्याने घट, रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्न बिकट.

सुनील काकडे/वाशिम : अमरावती विभागात येणार्‍या पाच जिल्ह्यांमधील प्रकल्पांमध्ये २0 नोव्हेंबरअखेर केवळ ६0 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २0१३ मध्ये याच तारखेला हा साठा ९२ टक्के होता. पावसाच्या अनियमिततेमुळे उद्भवलेल्या या समस्येने रब्बी हंगामातील सिंचनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमरावती विभागात केवळ ९ मोठे प्रकल्प आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील उध्र्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पूस, अरुणावती, बेंबळा, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि बुलढाणा जिल्ह्यातील वाण, नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा या प्रकल्पांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात आजपर्यंत एकही मोठे धरणे उभे राहू शकले नाही. सध्या उध्र्व वर्धा प्रकल्पात ८२ टक्के, पूस ६५ टक्के, अरुणावती २९ टक्के, बेंबळा ६६ टक्के, काटेपूर्णा २४ टक्के, वाण ८४ टक्के, नळगंगा ३६ टक्के, पेनटाकळी ३७ टक्के आणि खडकपूर्णा प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा असल्याची नोंद २0 नोव्हेंबरला घेण्यात आली; तथापि २ मोठे प्रकल्प ३0 टक्के; तर २ प्रकल्पांमध्ये आज रोजी ४0 टक्केही जलसाठा शिल्लक नसल्यामुळे या प्रकल्पांमधून पिण्यासाठी पाणी राखून ठेवणे आणि सिंचनासाठी पाणी सोडणे अशक्य झाले आहे. विभागातील मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील जलसाठय़ांची स्थितीदेखील अत्यंत विदारक आहे. पाच जिल्ह्यांमध्ये असणार्‍या २३ मध्यम प्रकल्पांमध्ये २0 नोव्हेंबर रोजी ६५ टक्के जलसाठा शिल्लक असून ४२८ लघू प्रकल्पांमध्ये ५0 टक्के जलसाठा आहे. २0१३ मध्ये याच तारखेला मध्यम प्रकल्प १00 टक्के भरलेली होती; तर २0१४ मध्ये ७५ टक्के पाणीसाठा होता. तथापि, यावर्षी सर्वच जिल्ह्यांमधील धरणांची पातळी कमालीची खालावल्यामुळे पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मोठी कसरत जलसंपदा विभागाला करावी लागत आहे.

*मराठवाड्यातील ८१४ प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के पाणीसाठा

राज्यातील २५४८ लघू, मध्यम व मोठय़ा प्रकल्पांमध्ये २0 नोव्हेंबर रोजी शिल्लक पाणीसाठय़ाचा विचार केल्यास, मराठवाड्यातील सर्वाधिक ८१४ प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे दिसून येते. ११ मोठय़ा प्रकल्पांमध्ये १५ टक्के, मध्यम ७५ प्रकल्पांमध्ये १५ टक्के, तर ७२८ लघूप्रकल्पांमध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

 

*२0 नोव्हेंबर रोजी विभागनिहाय प्रकल्प व शिल्लक पाणीसाठा

कोकण प्रदेश (१६0 प्रकल्प) :       ८३ टक्के

मराठवाडा (८१४ प्रकल्प) :           १४ टक्के

नागपूर (३६४ प्रकल्प) :               ४९ टक्के

अमरावती (४६0 प्रकल्प) :           ६0 टक्के

नाशिक (३५१ प्रकल्प) :               ५१ टक्के

पुणे (३९९ प्रकल्प) :                    ६५ टक्के