शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील धरणांमध्ये ६0 टक्के पाणीसाठा शिल्लक!

By admin | Updated: November 24, 2015 01:40 IST

२0१३ च्या तुलनेत ३२ टक्क्याने घट, रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्न बिकट.

सुनील काकडे/वाशिम : अमरावती विभागात येणार्‍या पाच जिल्ह्यांमधील प्रकल्पांमध्ये २0 नोव्हेंबरअखेर केवळ ६0 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २0१३ मध्ये याच तारखेला हा साठा ९२ टक्के होता. पावसाच्या अनियमिततेमुळे उद्भवलेल्या या समस्येने रब्बी हंगामातील सिंचनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमरावती विभागात केवळ ९ मोठे प्रकल्प आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील उध्र्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पूस, अरुणावती, बेंबळा, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि बुलढाणा जिल्ह्यातील वाण, नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा या प्रकल्पांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात आजपर्यंत एकही मोठे धरणे उभे राहू शकले नाही. सध्या उध्र्व वर्धा प्रकल्पात ८२ टक्के, पूस ६५ टक्के, अरुणावती २९ टक्के, बेंबळा ६६ टक्के, काटेपूर्णा २४ टक्के, वाण ८४ टक्के, नळगंगा ३६ टक्के, पेनटाकळी ३७ टक्के आणि खडकपूर्णा प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा असल्याची नोंद २0 नोव्हेंबरला घेण्यात आली; तथापि २ मोठे प्रकल्प ३0 टक्के; तर २ प्रकल्पांमध्ये आज रोजी ४0 टक्केही जलसाठा शिल्लक नसल्यामुळे या प्रकल्पांमधून पिण्यासाठी पाणी राखून ठेवणे आणि सिंचनासाठी पाणी सोडणे अशक्य झाले आहे. विभागातील मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील जलसाठय़ांची स्थितीदेखील अत्यंत विदारक आहे. पाच जिल्ह्यांमध्ये असणार्‍या २३ मध्यम प्रकल्पांमध्ये २0 नोव्हेंबर रोजी ६५ टक्के जलसाठा शिल्लक असून ४२८ लघू प्रकल्पांमध्ये ५0 टक्के जलसाठा आहे. २0१३ मध्ये याच तारखेला मध्यम प्रकल्प १00 टक्के भरलेली होती; तर २0१४ मध्ये ७५ टक्के पाणीसाठा होता. तथापि, यावर्षी सर्वच जिल्ह्यांमधील धरणांची पातळी कमालीची खालावल्यामुळे पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मोठी कसरत जलसंपदा विभागाला करावी लागत आहे.

*मराठवाड्यातील ८१४ प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के पाणीसाठा

राज्यातील २५४८ लघू, मध्यम व मोठय़ा प्रकल्पांमध्ये २0 नोव्हेंबर रोजी शिल्लक पाणीसाठय़ाचा विचार केल्यास, मराठवाड्यातील सर्वाधिक ८१४ प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे दिसून येते. ११ मोठय़ा प्रकल्पांमध्ये १५ टक्के, मध्यम ७५ प्रकल्पांमध्ये १५ टक्के, तर ७२८ लघूप्रकल्पांमध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

 

*२0 नोव्हेंबर रोजी विभागनिहाय प्रकल्प व शिल्लक पाणीसाठा

कोकण प्रदेश (१६0 प्रकल्प) :       ८३ टक्के

मराठवाडा (८१४ प्रकल्प) :           १४ टक्के

नागपूर (३६४ प्रकल्प) :               ४९ टक्के

अमरावती (४६0 प्रकल्प) :           ६0 टक्के

नाशिक (३५१ प्रकल्प) :               ५१ टक्के

पुणे (३९९ प्रकल्प) :                    ६५ टक्के