शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात १२00 कोटीची थकबाकी !

By admin | Updated: June 19, 2015 02:22 IST

वीज वितरण विभाग अडचणीत ; ‘आरसीआय’च्या थकबाकीमध्येही भरमसाठ वाढ.

वाशिम : दिवसेंदिवस वाढत चाललेले वीजचोरीचे प्रमाण आणि वीजगळतीमुळे हैराण झालेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला कृषीपंप वीज देयकांच्या थकबाकीनेही ग्रासले आहे. अमरावती विभागातील कृषीपंपधारक शेतकर्‍यांकडे मे २0१५ अखेर सुमारे १२00 कोटी रुपयाची थकबाकी आहे.पुर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची सन २00३ मध्ये पुनर्रचना होवून विद्युत कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ६ जून २00५ रोजी महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी र्मयादित (महानिर्मिर्ती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) अशा तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. राज्यातील ग्राहकांना वीज पुरविण्याची जबाबदारी असणार्‍या महावितरणचे मध्यंतरी कृषीपंपधारकांकडून वीज देयक वसूल करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. यामुळेच सद्यस्थितीत अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमधील कृषीपंपधारक शेतकर्‍यांकडे जवळपास १२00 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम थकीत आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यात थकबाकीचा आकडा २00 कोटी १0 लाख, बुलडाणा ५११ कोटी तर अकोला १५७ कोटीच्या घरात पोहचला आहे. यापाठोपाठ घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक स्वरुपातील वीजेचा वापर करणार्‍या ग्राहकांकडे देखील कोट्यवधी रुपयांची देयके थकीत असल्यामुळे महावितरण आर्थिक संकटांचा सामना करित असल्याचे दिसून येत आहे.यासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता उदय गाणार यांनी शेतकर्‍यांकडे कृषी वीजबिले अनेक वर्षांपासून थकीत असल्याचे सांगुन शेतक-यांनी वीजबिल थकबाकी भरण्याचे अवाहन केले आहे.