वाशिम : दिवसेंदिवस वाढत चाललेले वीजचोरीचे प्रमाण आणि वीजगळतीमुळे हैराण झालेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला कृषीपंप वीज देयकांच्या थकबाकीनेही ग्रासले आहे. अमरावती विभागातील कृषीपंपधारक शेतकर्यांकडे मे २0१५ अखेर सुमारे १२00 कोटी रुपयाची थकबाकी आहे.पुर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची सन २00३ मध्ये पुनर्रचना होवून विद्युत कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ६ जून २00५ रोजी महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी र्मयादित (महानिर्मिर्ती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) अशा तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. राज्यातील ग्राहकांना वीज पुरविण्याची जबाबदारी असणार्या महावितरणचे मध्यंतरी कृषीपंपधारकांकडून वीज देयक वसूल करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. यामुळेच सद्यस्थितीत अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमधील कृषीपंपधारक शेतकर्यांकडे जवळपास १२00 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम थकीत आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यात थकबाकीचा आकडा २00 कोटी १0 लाख, बुलडाणा ५११ कोटी तर अकोला १५७ कोटीच्या घरात पोहचला आहे. यापाठोपाठ घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक स्वरुपातील वीजेचा वापर करणार्या ग्राहकांकडे देखील कोट्यवधी रुपयांची देयके थकीत असल्यामुळे महावितरण आर्थिक संकटांचा सामना करित असल्याचे दिसून येत आहे.यासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता उदय गाणार यांनी शेतकर्यांकडे कृषी वीजबिले अनेक वर्षांपासून थकीत असल्याचे सांगुन शेतक-यांनी वीजबिल थकबाकी भरण्याचे अवाहन केले आहे.
अमरावती विभागात १२00 कोटीची थकबाकी !
By admin | Updated: June 19, 2015 02:22 IST