शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना निधी वाटप तहसीलदारांच्या मर्जीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:55 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठपुरावा नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी गतवर्षीच्या दुष्काळी मदतीपासून वंचित असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हाधिकारी कार्यालयाने दुष्काळी मदत निधीचे वाटप तहसीलदारांना केले. त्या निधीचे पुढे काय झाले, लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा झाला की नाही, याची कोणतीही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेत उपलब्ध नाही. ही बाब म्हणजे, दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात निधी जमा करण्याची बाब पूर्णपणे तहसीलदारांच्या मर्जीवर अवलंबून असल्याचे अधोरेखित करणारी आहे. त्यामुळेच शासनाचा कोट्यवधींचा निधी बँकांमध्ये ठरावीक काळापर्यंत ठेवून त्याचा लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रकार काही तालुक्यांमध्ये सुरू असल्याची माहिती आहे.खरीप हंगाम २०१८ मध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाने पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी १९९ कोटी १० लाख ९९५६० रुपये एवढी रक्कम अकोला जिल्हाधिकारी यांना दिली. त्यापैकी १३७ कोटी ६१ लाख रुपये फेब्रुवारी २०१९ अखेरपर्यंत देण्यात आली. त्यापैकी ६१ कोटी ४९ लाख रुपये काही महिन्यांपूर्वी देण्यात आले. पाचही तालुक्यांतील २ लाख १२ हजार शेतकºयांसाठी मागणी असलेली रक्कम मिळाली. जिल्हाधिकारी यांच्या नावे आलेली ही रक्कम त्यांनी अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, मूर्तिजापूर या पाच तहसीलदारांच्या नावाने वाटप केली. तहसीलदारांनी ती रक्कम शेतकºयांना वाटप होईपर्यंत कोणत्या बँकेत ठेवावी, यासाठी वाटाघाटी करीत बँकांकडून मोठा लाभ पदरात पाडून घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी बँकांच्या काही अटीही त्यांनी मान्य केल्या. त्यामध्ये कोट्यवधींची रक्कम किमान काही दिवस बँकेच्या खात्यातच ठेवावी लागणार, हेही ठरले. तेवढ्या दिवसांपर्यंत शेतकºयांना मदत वाटपाची प्रक्रिया या ना त्या कारणाने रोखून धरण्याचा प्रकार काही तहसीलदारांनी केला आहे.तहसीलदारांचे हे प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठपुरावा नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी गतवर्षीच्या दुष्काळी मदतीपासून वंचित असल्याची माहिती आहे.

पत्रातून विचारणार वाटपाची माहितीतहसीलदारांना वाटप केलेला किती निधी शेतकºयांच्या खात्यात गेला, किती शिल्लक आहे, किती लाभार्थींना अद्याप वाटप व्हायचे आहे, याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय आता पत्राद्वारे विचारणार आहे. वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रक्रियेविषयी महसूल विभाग किती तत्पर आहे, हेही यातून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी