शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शेतकऱ्यांना निधी वाटप तहसीलदारांच्या मर्जीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:55 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठपुरावा नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी गतवर्षीच्या दुष्काळी मदतीपासून वंचित असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हाधिकारी कार्यालयाने दुष्काळी मदत निधीचे वाटप तहसीलदारांना केले. त्या निधीचे पुढे काय झाले, लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा झाला की नाही, याची कोणतीही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेत उपलब्ध नाही. ही बाब म्हणजे, दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात निधी जमा करण्याची बाब पूर्णपणे तहसीलदारांच्या मर्जीवर अवलंबून असल्याचे अधोरेखित करणारी आहे. त्यामुळेच शासनाचा कोट्यवधींचा निधी बँकांमध्ये ठरावीक काळापर्यंत ठेवून त्याचा लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रकार काही तालुक्यांमध्ये सुरू असल्याची माहिती आहे.खरीप हंगाम २०१८ मध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाने पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी १९९ कोटी १० लाख ९९५६० रुपये एवढी रक्कम अकोला जिल्हाधिकारी यांना दिली. त्यापैकी १३७ कोटी ६१ लाख रुपये फेब्रुवारी २०१९ अखेरपर्यंत देण्यात आली. त्यापैकी ६१ कोटी ४९ लाख रुपये काही महिन्यांपूर्वी देण्यात आले. पाचही तालुक्यांतील २ लाख १२ हजार शेतकºयांसाठी मागणी असलेली रक्कम मिळाली. जिल्हाधिकारी यांच्या नावे आलेली ही रक्कम त्यांनी अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, मूर्तिजापूर या पाच तहसीलदारांच्या नावाने वाटप केली. तहसीलदारांनी ती रक्कम शेतकºयांना वाटप होईपर्यंत कोणत्या बँकेत ठेवावी, यासाठी वाटाघाटी करीत बँकांकडून मोठा लाभ पदरात पाडून घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी बँकांच्या काही अटीही त्यांनी मान्य केल्या. त्यामध्ये कोट्यवधींची रक्कम किमान काही दिवस बँकेच्या खात्यातच ठेवावी लागणार, हेही ठरले. तेवढ्या दिवसांपर्यंत शेतकºयांना मदत वाटपाची प्रक्रिया या ना त्या कारणाने रोखून धरण्याचा प्रकार काही तहसीलदारांनी केला आहे.तहसीलदारांचे हे प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठपुरावा नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी गतवर्षीच्या दुष्काळी मदतीपासून वंचित असल्याची माहिती आहे.

पत्रातून विचारणार वाटपाची माहितीतहसीलदारांना वाटप केलेला किती निधी शेतकºयांच्या खात्यात गेला, किती शिल्लक आहे, किती लाभार्थींना अद्याप वाटप व्हायचे आहे, याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय आता पत्राद्वारे विचारणार आहे. वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रक्रियेविषयी महसूल विभाग किती तत्पर आहे, हेही यातून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी