शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

अकोल्यातील खराब तांदळाचे अमरावतीत वाटप; ‘वखार’च्या अकोला गोदामातील प्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:08 IST

अकोला: शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ खराब झाल्याने अकोला जिल्हय़ातील लाभार्थींना वाटप करण्यास प्रशासनाने नकार दिला. याप्रकरणी कारवाईतून वखारच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी तोच तांदूळ प्रतवारी सुधारण्याच्या नावाखाली धामणगाव रेल्वेच्या गोदामात हलविण्यात आला.

ठळक मुद्देखराब तांदळाची प्रत धामणगावात सुधारणार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ खराब झाल्याने अकोला जिल्हय़ातील लाभार्थींना वाटप करण्यास प्रशासनाने नकार दिला. याप्रकरणी कारवाईतून वखारच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी तोच तांदूळ प्रतवारी सुधारण्याच्या नावाखाली धामणगाव रेल्वेच्या गोदामात हलविण्यात आला. प्रत्यक्षात त्याचे वाटप अमरावती जिल्हय़ातील लाभार्थींना होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अकोल्यात खराब झालेला तांदूळ अमरावती जिल्हय़ातील लाभार्थींच्या माथी मारण्यात वखार महामंडळ यशस्वी झाले आहे.सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जाते. त्यासाठी राज्य शासन भारतीय खाद्य निगमकडून धान्याची खरेदी करते. धान्याचा पुरवठा करण्यासाठी भारतीय खाद्य निगमने अकोला एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम भाड्याने घेत तेथे साठा केला. जिल्हाधिकार्‍यांनी मागणी केल्यानुसार गहू, तांदुळाचा पुरवठा वखारच्या गोदामातून केला जातो. गेल्या दोन वर्षांत भारतीय खाद्य निगमने वखारच्या गोदामात साठा केलेल्या गहू, तांदुळाच्या साठय़ात हजारो क्विंटलची तफावत आली आहे. तसेच उपलब्ध साठय़ापैकी मोठय़ा प्रमाणात धान्य खराब झाले. ते धान्य जिल्हाधिकार्‍यांच्या शासकीय गोदामांतून लाभार्थींना वाटप करण्याची तयारी राज्य वखार महामंडळाच्या व्यवस्थापनाने केली; मात्र तांदूळ खराब असल्याने तो घेण्यास अकोला जिल्हा प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे डिसेंबर २0१७ पासून त्या गोदामातून धान्याची उचल बंद केली. त्यातच भारतीय खाद्य निगमने गोदामातील धान्य साठा शून्य करून दोन वर्षांतील धान्याचा हिशेब दिल्याशिवाय वखार महामंडळाच्या गोदामात नव्याने पुरवठा करणेही बंद केले. अडचणीत आलेल्या वखार महामंडळाने भारतीय खाद्य निगमला तांदुळाबाबत निर्णय घेण्यासाठी पत्रव्यवहार केला. त्यानुसार खाद्य निगमच्या तीन अधिकार्‍यांच्या पथकाने वखारच्या गोदामात १४ डिसेंबर रोजी धडक दिली. खराब झालेला २६६२ क्विंटल तांदूळ, २५0 क्विंटलपेक्षाही अधिक गव्हाची पाहणी पथकाने केली. 

खराब तांदळाची प्रत धामणगावात सुधारणार!वखार महामंडळाने खराब झालेल्या २६६२ क्विंटल तांदुळाची प्रतवारी सुधारण्यासाठी अकोल्याच्या गोदामातून धामणगाव रेल्वेच्या गोदामात हलविला. प्रत्यक्षात अमरावती जिल्हय़ाचा विस्तार आणि लाभार्थी संख्या पाहता त्यांना हा तांदूळ मिक्स करून वाटप करण्याचा डाव त्यामागे असल्याची माहिती आहे. 

अकोल्यातील तूट कशी भरून काढणार!खाद्य निगमने अकोला जिल्हय़ासाठी दिलेल्या तांदुळापैकी २६६२ क्विंटल तांदूळ खराब झाला. तो धामणगावात हलविण्यात आला. त्यामुळे अकोला जिल्हय़ासाठी पुरवठा केलेल्या तांदुळातील तूट वखार महामंडळ कशी भरून देणार, हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. त्याचवेळी धामणगावात प्रतवारी सुधारून तांदूळ आणल्याचाही बनाव केला जाण्याची शक्यता आहे. त्यातून वखारच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना वाचविण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. 

भारतीय खाद्य निगमने अकोल्यातील तांदुळाची प्रतवारी सुधारण्यासाठी धामणगावच्या गोदामात हलविण्याचे वखारच्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाला सांगितले. त्यानुसार तांदूळ हलविण्यात आला. - शि. र. अडकमोल, नवृत्त विभागीय व्यवस्थापक, वखार महामंडळ, अमरावती.

टॅग्स :Akola cityअकोला शहरMarketबाजार