शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील खराब तांदळाचे अमरावतीत वाटप; ‘वखार’च्या अकोला गोदामातील प्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:08 IST

अकोला: शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ खराब झाल्याने अकोला जिल्हय़ातील लाभार्थींना वाटप करण्यास प्रशासनाने नकार दिला. याप्रकरणी कारवाईतून वखारच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी तोच तांदूळ प्रतवारी सुधारण्याच्या नावाखाली धामणगाव रेल्वेच्या गोदामात हलविण्यात आला.

ठळक मुद्देखराब तांदळाची प्रत धामणगावात सुधारणार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ खराब झाल्याने अकोला जिल्हय़ातील लाभार्थींना वाटप करण्यास प्रशासनाने नकार दिला. याप्रकरणी कारवाईतून वखारच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी तोच तांदूळ प्रतवारी सुधारण्याच्या नावाखाली धामणगाव रेल्वेच्या गोदामात हलविण्यात आला. प्रत्यक्षात त्याचे वाटप अमरावती जिल्हय़ातील लाभार्थींना होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अकोल्यात खराब झालेला तांदूळ अमरावती जिल्हय़ातील लाभार्थींच्या माथी मारण्यात वखार महामंडळ यशस्वी झाले आहे.सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जाते. त्यासाठी राज्य शासन भारतीय खाद्य निगमकडून धान्याची खरेदी करते. धान्याचा पुरवठा करण्यासाठी भारतीय खाद्य निगमने अकोला एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम भाड्याने घेत तेथे साठा केला. जिल्हाधिकार्‍यांनी मागणी केल्यानुसार गहू, तांदुळाचा पुरवठा वखारच्या गोदामातून केला जातो. गेल्या दोन वर्षांत भारतीय खाद्य निगमने वखारच्या गोदामात साठा केलेल्या गहू, तांदुळाच्या साठय़ात हजारो क्विंटलची तफावत आली आहे. तसेच उपलब्ध साठय़ापैकी मोठय़ा प्रमाणात धान्य खराब झाले. ते धान्य जिल्हाधिकार्‍यांच्या शासकीय गोदामांतून लाभार्थींना वाटप करण्याची तयारी राज्य वखार महामंडळाच्या व्यवस्थापनाने केली; मात्र तांदूळ खराब असल्याने तो घेण्यास अकोला जिल्हा प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे डिसेंबर २0१७ पासून त्या गोदामातून धान्याची उचल बंद केली. त्यातच भारतीय खाद्य निगमने गोदामातील धान्य साठा शून्य करून दोन वर्षांतील धान्याचा हिशेब दिल्याशिवाय वखार महामंडळाच्या गोदामात नव्याने पुरवठा करणेही बंद केले. अडचणीत आलेल्या वखार महामंडळाने भारतीय खाद्य निगमला तांदुळाबाबत निर्णय घेण्यासाठी पत्रव्यवहार केला. त्यानुसार खाद्य निगमच्या तीन अधिकार्‍यांच्या पथकाने वखारच्या गोदामात १४ डिसेंबर रोजी धडक दिली. खराब झालेला २६६२ क्विंटल तांदूळ, २५0 क्विंटलपेक्षाही अधिक गव्हाची पाहणी पथकाने केली. 

खराब तांदळाची प्रत धामणगावात सुधारणार!वखार महामंडळाने खराब झालेल्या २६६२ क्विंटल तांदुळाची प्रतवारी सुधारण्यासाठी अकोल्याच्या गोदामातून धामणगाव रेल्वेच्या गोदामात हलविला. प्रत्यक्षात अमरावती जिल्हय़ाचा विस्तार आणि लाभार्थी संख्या पाहता त्यांना हा तांदूळ मिक्स करून वाटप करण्याचा डाव त्यामागे असल्याची माहिती आहे. 

अकोल्यातील तूट कशी भरून काढणार!खाद्य निगमने अकोला जिल्हय़ासाठी दिलेल्या तांदुळापैकी २६६२ क्विंटल तांदूळ खराब झाला. तो धामणगावात हलविण्यात आला. त्यामुळे अकोला जिल्हय़ासाठी पुरवठा केलेल्या तांदुळातील तूट वखार महामंडळ कशी भरून देणार, हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. त्याचवेळी धामणगावात प्रतवारी सुधारून तांदूळ आणल्याचाही बनाव केला जाण्याची शक्यता आहे. त्यातून वखारच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना वाचविण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. 

भारतीय खाद्य निगमने अकोल्यातील तांदुळाची प्रतवारी सुधारण्यासाठी धामणगावच्या गोदामात हलविण्याचे वखारच्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाला सांगितले. त्यानुसार तांदूळ हलविण्यात आला. - शि. र. अडकमोल, नवृत्त विभागीय व्यवस्थापक, वखार महामंडळ, अमरावती.

टॅग्स :Akola cityअकोला शहरMarketबाजार