शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शतप्रतिशत भाजपाला युतीधर्माचा अडसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 13:19 IST

युतीधर्म पाळण्यासाठी भाजपाला किमान दोन मतदारसंघ सेनेला देण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचे चित्र आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा मनाने अन् मोदी लाटेने एकत्र आल्यामुळे आता विधानसभेत युती कायम राहील यात कोणालाही शंका नाही. त्यामुळेच आता युतीधर्म पाळण्यासाठी भाजपाला किमान दोन मतदारसंघ सेनेला देण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचे चित्र आहे.भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब फुंडकर यांनी त्यांच्या कार्यकाळात शतप्रतिशत भाजपा हा नारा दिला होता. यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये सत्ताकेंद्र ताब्यात घेण्यासाठी भाजपा सरसावली. त्यामध्ये अकोला अग्रेसर होता. अकोला जिल्ह्यात भाजपाने निर्माण केलेले एकहाती वर्चस्व हे भाजपाने स्वबळावर मिळविलेले यश ठरले. काँग्रेससारख्या मोठे नेटवर्क असलेल्या पक्षालाही भाजपासमोर नामोहरम व्हावे लागले, त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने स्वबळावर सर्व मतदारसंघ जिंकण्याची रणनीती आखत शतप्रतिशत भाजपा हा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी रणशिंग फुंकले होते; मात्र लोकसभेसाठी भाजपा, सेना एकत्र आल्याने आता भाजपाला स्वबळाचा नारा सोडून देत युतीधर्म पाळावा लागणार आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी युती मध्ये सर्वात आधी जागा वाटपाचा गुंता निर्माण होऊ शकतो. अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघां पैकी भाजपाने चार मतदारसंघात विजय मिळविला आहे. त्यामुळे सेनेला एक मतदारसंघ भाजपाला देणे सहज शक्य आहे; मात्र सेनेचा बाळापूर, अकोट अशा दोन मतदारसंघावर दावा आहे. तसेच अकोल्यातील शहरी मतदारसंघ असलेला अकोला पश्चिमही मिळावा, असे प्रयत्न आहेत. बाळापुरात भाजपाचे आमदार नसल्यामुळे हा मतदारसंघ सेनेला देण्यात भाजपाला अडचण येणार नाही; मात्र अकोट व अकोला पश्चिममध्ये भाजपाचे सर्वात ज्येष्ठ आमदार प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे ऐनवेळीसेनेची एकाच मतदारसंघावर बोळवण होण्याची चिन्हे आहेत. असे झाले तर भाजपासमोर सेना बंडखोरांचे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाचे अकोल्यावर वर्चस्व असले तरी युतीमध्ये सेनेला तसेच घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामच्याही अपेक्षांचे ओझे भाजपावर राहणार आहे. त्यामुळे युती धर्म पाळण्यासाठी भाजपाला बॅकफुटवर यावे लागणार आहे.

अरविंद सावंत यांची करडी नजरशिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणून खा. अरविंद सावंत यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत झाली. हेडमास्तरांच्या भूमिकेत सावंत यांनी शिवसैनिकांना शिस्त लावली. आता सावंत यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपविल्यामुळे त्यांच्याही शब्दाला अधिक वजन प्राप्त झाले आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या घडामोडीवर त्यांची करडी नजर राहणार असल्याने सेनेला सन्मानजनक वाटा मिळेल, अशी आशा शिवसैनिकांना आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाAkolaअकोलाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण