शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

सर्व बाजार समित्यांमध्ये अधिनियमाचे उल्लंघन!

By admin | Updated: May 9, 2017 02:44 IST

हमीपेक्षा कमी भावाने तूर खरेदी ; व्यापा-यांसह संचालक मंडळावर कारवाई केव्हा?

अकोला : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गेल्या चार महिन्यापासून आधारभूत पेक्षा कमी दराने तुरीची खरेदी करण्यात आली. व्यापार्‍यांच्या या व्यवहाराकडे बाजार समितीने पूर्णत: दुर्लक्ष केले. याविषयी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमाला हरताळ फासला आहे. शेतकर्‍यांची पिळवणूक करणार्‍या व्यापार्‍यासह बाजार समितीच्या संचालक मंडळ व सचिवांवर कारवाई केव्हा करणार, असा संतप्त शेतकर्‍यांचा सवाल आहे.जिल्ह्यात यावर्षी तुरीचे बंपर उत्पादन झाले. डिसेंबरपासून बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक सुरू झाली. मागील वर्षी १२ हजार रुपये असणारे भाव यंदा कमालीचे कोसळले. हंगामापूर्वीच तीन हजार रुपये भावाने बाजार समित्यांमध्ये तुरीची खरेदी झाली. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या निकडीचा लाभ व्यापार्‍यांनी उठविला व शेतकर्‍यांकडून कमी भावाने खरेदी केलेल्या तुरीची शासकीय खरेदी केंद्रात मोठय़ा प्रमाणात विक्री करण्यात आली. यामध्ये शेतकर्‍यांची पिळवणूक झाली. दरम्यान, प्रत्येक बाजार समितीने प्रमाणित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे बसवून याच काट्यावर शेतमालाचे वजन होईल, याची दक्षता घेण्याचे पणन संचालकांचे आदेश आहे. नामांकित कंपनीचे कोटेशन मागवून कमी दराचे कोटेशन मान्य करून त्याला अधिनियमाने मान्यता देण्यात येते व याच इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्याद्वारेच शेतमालाचे वजन करणे बंधनकारक असताना एकाही बाजार समितीत अधिनियमाचे पालन झालेले नाही. महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ मधील तरतुदीनुसार बाजार समित्यांवर सोपविलेली जबाबदारी नीट पार पाडली गेली नाही. यामध्ये हयगय व दुर्लक्ष झाल्यामुळे बाजार समित्यांचे संचालक मंडळ व सचिव याला सर्वस्वी दोषी असल्याने कारवाई केव्हा, अशी विचारणा शेतकरी करीत आहेत. "त्या" व्यापार्‍यांकडून रक्कम वसूल करावी!बाजार समितीच्या आवारात आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापार्‍यांनी खरेदी केली असल्यास त्याची बाजार समितीने तपासणी करून संबंधित व्यापार्‍याकडून रक्कम वसूल करण्याबाबत बाजार समितीने कारवाई करून अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करावा.तर संचालक मंडळ, सचिवांवर कारवाईया अधिनियमाची अंमलबजावणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केली जाते किंवा नाही, याची पडताळणी जिल्हा उपनिबंधकांनी करावी व ज्या बाजार समित्यांमध्ये अधिनियमाचे पालन होत नसेल, तर त्या बाजार समिती विरोधात अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई अपेक्षित असताना जिल्ह्यात कुठेही ही कारवाई झालेली नाही.या संदर्भात भारत कृषक समाजाच्या पत्रावर शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार चौकशी समिती स्थापन केली असून, तूर खरेदीबाबतची चौकशी सुरू करीत आहोत.- गोपाल मावळे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला.