शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

सर्व बाजार समित्यांमध्ये अधिनियमाचे उल्लंघन!

By admin | Updated: May 9, 2017 02:44 IST

हमीपेक्षा कमी भावाने तूर खरेदी ; व्यापा-यांसह संचालक मंडळावर कारवाई केव्हा?

अकोला : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गेल्या चार महिन्यापासून आधारभूत पेक्षा कमी दराने तुरीची खरेदी करण्यात आली. व्यापार्‍यांच्या या व्यवहाराकडे बाजार समितीने पूर्णत: दुर्लक्ष केले. याविषयी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमाला हरताळ फासला आहे. शेतकर्‍यांची पिळवणूक करणार्‍या व्यापार्‍यासह बाजार समितीच्या संचालक मंडळ व सचिवांवर कारवाई केव्हा करणार, असा संतप्त शेतकर्‍यांचा सवाल आहे.जिल्ह्यात यावर्षी तुरीचे बंपर उत्पादन झाले. डिसेंबरपासून बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक सुरू झाली. मागील वर्षी १२ हजार रुपये असणारे भाव यंदा कमालीचे कोसळले. हंगामापूर्वीच तीन हजार रुपये भावाने बाजार समित्यांमध्ये तुरीची खरेदी झाली. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या निकडीचा लाभ व्यापार्‍यांनी उठविला व शेतकर्‍यांकडून कमी भावाने खरेदी केलेल्या तुरीची शासकीय खरेदी केंद्रात मोठय़ा प्रमाणात विक्री करण्यात आली. यामध्ये शेतकर्‍यांची पिळवणूक झाली. दरम्यान, प्रत्येक बाजार समितीने प्रमाणित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे बसवून याच काट्यावर शेतमालाचे वजन होईल, याची दक्षता घेण्याचे पणन संचालकांचे आदेश आहे. नामांकित कंपनीचे कोटेशन मागवून कमी दराचे कोटेशन मान्य करून त्याला अधिनियमाने मान्यता देण्यात येते व याच इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्याद्वारेच शेतमालाचे वजन करणे बंधनकारक असताना एकाही बाजार समितीत अधिनियमाचे पालन झालेले नाही. महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ मधील तरतुदीनुसार बाजार समित्यांवर सोपविलेली जबाबदारी नीट पार पाडली गेली नाही. यामध्ये हयगय व दुर्लक्ष झाल्यामुळे बाजार समित्यांचे संचालक मंडळ व सचिव याला सर्वस्वी दोषी असल्याने कारवाई केव्हा, अशी विचारणा शेतकरी करीत आहेत. "त्या" व्यापार्‍यांकडून रक्कम वसूल करावी!बाजार समितीच्या आवारात आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापार्‍यांनी खरेदी केली असल्यास त्याची बाजार समितीने तपासणी करून संबंधित व्यापार्‍याकडून रक्कम वसूल करण्याबाबत बाजार समितीने कारवाई करून अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करावा.तर संचालक मंडळ, सचिवांवर कारवाईया अधिनियमाची अंमलबजावणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केली जाते किंवा नाही, याची पडताळणी जिल्हा उपनिबंधकांनी करावी व ज्या बाजार समित्यांमध्ये अधिनियमाचे पालन होत नसेल, तर त्या बाजार समिती विरोधात अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई अपेक्षित असताना जिल्ह्यात कुठेही ही कारवाई झालेली नाही.या संदर्भात भारत कृषक समाजाच्या पत्रावर शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार चौकशी समिती स्थापन केली असून, तूर खरेदीबाबतची चौकशी सुरू करीत आहोत.- गोपाल मावळे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला.