शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील चारही ब्रिटिशकालीन पूल धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:21 IST

बांधकाम विभागाने रस्ता निर्माण कार्यासाठी संबंधित राज्य महामार्ग व पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)कडे सोपविल्याची माहिती आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बनल्याचे समोर आल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. पुलांचे आॅडिट करण्यासाठी शासन स्तरावरून ‘एसजीसी’कन्सल्टन्सीची नियुक्ती करण्यात आली असता यामध्ये जिल्ह्यातील चार पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. आॅडिटमध्ये चारही ब्रिटिशकालीन पुलांचे आयुर्मान शिल्लक असले तरी दुरुस्तीअभावी धोकादायक बनल्याचे नमूद आहे. बांधकाम विभागाने रस्ता निर्माण कार्यासाठी संबंधित राज्य महामार्ग व पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)कडे सोपविल्याची माहिती आहे.राज्यातील महाड-रायगड मार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याने २०१७ मध्ये मोठी जीवितहानी झाली होती. त्या पृष्ठभूमीवर तत्कालीन सरकारने ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. जिल्ह्यातील चार पुलांच्या आॅडिटसाठी एसजीसी कन्सल्टन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित कन्सल्टन्सीने पुलांचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही दिवसांपूर्वी सादर केला असून, त्यामध्ये चारही पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे नमूद करीत दुरुस्तीसाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. यादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्यावतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे निर्माण कार्य सुरू आहे.त्यामुळे राज्य महामार्गावरील चारही पूल साबांविने ‘एनएचएआय’कडे हस्तांतरित केले आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम अतिशय संथगतीने होत असल्यामुळे ब्रिटिशकालीन पुलावरून होणारी वाहतूक लक्षात घेता अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र आहे.

पुलांची दर सहा महिन्यांनी तपासणीसार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व १७० पुलांची दर सहा महिन्यांतून तपासणी केली जाते. ब्रिटिशकालीन पूल वगळता इतर सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’कडे शुल्क जमा केल्याची माहिती आहे.

राष्ट्रीय व राज्य मार्गाचे निर्माण कार्य ‘एनएचएआय’च्या माध्यमातून केले जात असल्याने ‘पीडब्ल्यूडी’ने ब्रिटिशकालीन पुलांचे हस्तांतरण केले आहे. चार पुलांपैकी गांधीग्राम व लोहारा येथील पुलाच्या ऐवजी नवीन पुलाची उभारणी केली जाईल. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया आटोपताच पुढील कामाला सुरुवात होईल.-रावसाहेब झाल्टे, कार्यकारी अभियंता ‘एनएचएआय’

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग