शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

आकोट तालुक्यात वादळाच्या तडाख्याने फळबागा भुईसपाट

By admin | Updated: October 30, 2015 01:43 IST

आकोट तालुक्यातील अकोली जहॉगीरसह बागायती क्षेत्रातील फळबागाचे नुकसान.

आकोट : आधीच दुष्काळी परिस्थितीशी संघर्ष करीत असलेल्या शेतकर्‍यांना २८ ऑक्टोबरच्या रात्री वादळ-वार्‍याचा तडाखा बसला. आकोट तालुक्यातील अकोली जहॉगीरसह बागायती क्षेत्रातील फळबागाचे नुकसान झाले आहे. केळी व संत्रा मातीमोल झाला असून पर्‍हाटी व ज्वारीची पिके वार्‍याच्या वेगामुळे वाकली आहेत. लाखो रुपयांचे नैसर्गिक नुकसान झाले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या नुकसानीचा पाहणी अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आला आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी मोठय़ा प्रमाणात हजारो हेक्टर क्षेत्रात संत्रा व केळीच्या बागा आहेत. या बागांमध्ये बहरलेला कोट्यवधी रुपये किंमतीचा संत्रा वादळामुळे जमिनीवर गळून पडला, अनेक झाडे मोडून पडलीत. बोंड्याने लदबदलेली पर्‍हाटीची झाडे व ज्वारीचे पीक झोपल्याने मातीमोल झाले आहे. अकोली जहॉ., रुईखेड या भागातील केळी संत्रा पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात जवळपास २00 ते ३00 हेक्टरच्या वर नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या. काही झाडे पडली, केळीचे घड जमीनदोस्त झाले आहेत. तहसीलदार प्रदीप पाटील यांनी अकोली जहॉगीर, राजुरा, अंबाडी, कपाशी या शेतशिवारात पाहणी केली. या चार शेतशिवारात प्राथमिक अंदाजानुसार ३५ हेक्टर केळी, तर ५५ हेक्टर संत्रा बागांचे नुकसान झाले असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.आधीच नापिकी व अनियमित पर्जन्यमानाचा फटका पिकांना सहन करावा लागत आहे. खरीप हंगामात शेतीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी फळबागाकडे लक्ष दिले होते. परंतु, वादळाचा तडाखा फळबागांना बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. यापूर्वी १0 फेब्रुवारीच्या वादळी पावसामुळे आकोट तालुक्यात ७८0 हेक्टर केळीचे पीक व ८४0 हेक्टर संत्रा पिकाची नासाडी झाली होती.