शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आकोट तालुक्यात वादळाच्या तडाख्याने फळबागा भुईसपाट

By admin | Updated: October 30, 2015 01:43 IST

आकोट तालुक्यातील अकोली जहॉगीरसह बागायती क्षेत्रातील फळबागाचे नुकसान.

आकोट : आधीच दुष्काळी परिस्थितीशी संघर्ष करीत असलेल्या शेतकर्‍यांना २८ ऑक्टोबरच्या रात्री वादळ-वार्‍याचा तडाखा बसला. आकोट तालुक्यातील अकोली जहॉगीरसह बागायती क्षेत्रातील फळबागाचे नुकसान झाले आहे. केळी व संत्रा मातीमोल झाला असून पर्‍हाटी व ज्वारीची पिके वार्‍याच्या वेगामुळे वाकली आहेत. लाखो रुपयांचे नैसर्गिक नुकसान झाले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या नुकसानीचा पाहणी अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आला आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी मोठय़ा प्रमाणात हजारो हेक्टर क्षेत्रात संत्रा व केळीच्या बागा आहेत. या बागांमध्ये बहरलेला कोट्यवधी रुपये किंमतीचा संत्रा वादळामुळे जमिनीवर गळून पडला, अनेक झाडे मोडून पडलीत. बोंड्याने लदबदलेली पर्‍हाटीची झाडे व ज्वारीचे पीक झोपल्याने मातीमोल झाले आहे. अकोली जहॉ., रुईखेड या भागातील केळी संत्रा पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात जवळपास २00 ते ३00 हेक्टरच्या वर नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या. काही झाडे पडली, केळीचे घड जमीनदोस्त झाले आहेत. तहसीलदार प्रदीप पाटील यांनी अकोली जहॉगीर, राजुरा, अंबाडी, कपाशी या शेतशिवारात पाहणी केली. या चार शेतशिवारात प्राथमिक अंदाजानुसार ३५ हेक्टर केळी, तर ५५ हेक्टर संत्रा बागांचे नुकसान झाले असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.आधीच नापिकी व अनियमित पर्जन्यमानाचा फटका पिकांना सहन करावा लागत आहे. खरीप हंगामात शेतीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी फळबागाकडे लक्ष दिले होते. परंतु, वादळाचा तडाखा फळबागांना बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. यापूर्वी १0 फेब्रुवारीच्या वादळी पावसामुळे आकोट तालुक्यात ७८0 हेक्टर केळीचे पीक व ८४0 हेक्टर संत्रा पिकाची नासाडी झाली होती.