शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

अकोट: तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

अकोट : तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप निकाली लागला नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. कोरोनाच्या काळात ...

अकोट : तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप निकाली लागला नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. कोरोनाच्या काळात पाणंद रस्त्यांसाठी निधीच नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पहिल्याच पावसात रस्ते चिखलमय झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

तालुक्यातील पनोरी, टाकळी बु, दनोरी शिवारातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जात शेती फुलवावी लागत आहे. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतात खताचे पोते ने-आण करणे आदी कामाकरिता शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असते; मात्र शेतरस्त्यांच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने चिखल तुडवतच शेतकऱ्यांना शेतात जावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

--------------------------

चिखल तुडवत जावे लागते शेतात

अकोट तालुक्यात शेतरस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतरस्त्याची अवस्था जैसे थे आहे. रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतात कामासाठी जावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतरस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

-----------------------------

सध्या शेती मशागतीची कामे सुरू आहेत. शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने बैलजोडी, ट्रॅक्टर नेण्यासाठी शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शेतरस्त्याचे खडीकरण करावे.

-विजय दाते, पनोरी.

----------------------

शेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. चिखल तुडवत शेतकऱ्यांना शेतामध्ये जावे लागते. शेतात बैलगाडी, कुठल्याच प्रकारची वाहने जाऊ शकत नसल्याने खते, शेतमाल डोक्यावर घरी आणावा लागतो.

-चरणदास बुंदे, पनोरी.