शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोट: तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

अकोट : तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप निकाली लागला नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. कोरोनाच्या काळात ...

अकोट : तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप निकाली लागला नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. कोरोनाच्या काळात पाणंद रस्त्यांसाठी निधीच नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पहिल्याच पावसात रस्ते चिखलमय झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

तालुक्यातील पनोरी, टाकळी बु, दनोरी शिवारातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जात शेती फुलवावी लागत आहे. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतात खताचे पोते ने-आण करणे आदी कामाकरिता शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असते; मात्र शेतरस्त्यांच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने चिखल तुडवतच शेतकऱ्यांना शेतात जावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

--------------------------

चिखल तुडवत जावे लागते शेतात

अकोट तालुक्यात शेतरस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतरस्त्याची अवस्था जैसे थे आहे. रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतात कामासाठी जावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतरस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

-----------------------------

सध्या शेती मशागतीची कामे सुरू आहेत. शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने बैलजोडी, ट्रॅक्टर नेण्यासाठी शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शेतरस्त्याचे खडीकरण करावे.

-विजय दाते, पनोरी.

----------------------

शेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. चिखल तुडवत शेतकऱ्यांना शेतामध्ये जावे लागते. शेतात बैलगाडी, कुठल्याच प्रकारची वाहने जाऊ शकत नसल्याने खते, शेतमाल डोक्यावर घरी आणावा लागतो.

-चरणदास बुंदे, पनोरी.