शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

अकोट : तपासणीच्या नावाखाली मेळघाटातील आदिवासींच्या घरात नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:27 IST

पोपटखेड : विविध मागण्यांसाठी मूळ गावात गेलेल्या पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांमध्ये वन विभागाने १८ जानेवारी रोजी शोधमोहीम राबवली. या मोहिमेच्या नावाखाली पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांची नासधूस करण्यात आली, तसेच त्यांचे जेवण फेकून दिल्याचा आरोप विष्णू राऊत यांनी केला आहे. 

ठळक मुद्देग्रामस्थांचा आरोप वन विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कपोपटखेड : विविध मागण्यांसाठी मूळ गावात गेलेल्या पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांमध्ये वन विभागाने १८ जानेवारी रोजी शोधमोहीम राबवली. या मोहिमेच्या नावाखाली पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांची नासधूस करण्यात आली, तसेच त्यांचे जेवण फेकून दिल्याचा आरोप विष्णू राऊत यांनी केला आहे. मेळघाटमधून पुनर्वसन होऊन मौजे गुल्लरघाट, धारगड, केलपाणी, बारुखेडा, आमोना, सोमठाणा बु., सोमठाणा खु. नागरतास या गावांचे अकोट तालुक्यामधे पुनर्वसन झाले होते. पुनर्वसित गावांमधील नागरिक त्यांना शेती मिळत नसल्याने २५ डिसेंबर २0१७ रोजी आमोना मार्गे पोच मार्गाने मेळघाटातील पूर्वीच्या गावी पोहोचले होते. पूर्वीच्या गावी जाऊन पुनर्वसित आदिवासी नागरिकांना चोवीस दिवस झाले आहेत. या चोवीस दिवसांपासून ते शांततेने आंदोलन करीत आहेत. १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान  गुल्लरघाट, धारगड, बारुखेडा, नागरतास या गावांमध्ये वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी तपासणीच्या नावाखाली आदिवासी नागरिकांच्या साहित्याची नासधूस केली. तसेच त्यांच्या जेवणाचीही नासाडी केली. तसेच पुनर्वसित आदिवासी लोकांशी असभ्य वागणूक केली, अशी माहिती पुनर्वसित आदिवासी ग्रामस्थ विष्णू राऊत यांनी दिली. राऊत यांनी सांगितले, की आम्ही सर्व आदिवासी गेल्या २४ दिवसांपासून शांततेने आमच्या मागणीकरिता आंदोलन करीत आहोत. आम्ही मेळघाटमधील जंगल तसेच जंगली प्राणी, वन विभाग कर्मचारी, अधिकारी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही; परंतु वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देत आहेत. आम्हाला जोपर्यंत शेती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन शांतपणे सुरूच ठेवणार आहोत, असेही ते म्हणाले. वन विभागाकडून आम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिल्यास काही विपरीत घडले, तर याला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशारा विष्णू राऊत यांनी दिला आहे. 

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पakotअकोट