शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अकोट : तपासणीच्या नावाखाली मेळघाटातील आदिवासींच्या घरात नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:27 IST

पोपटखेड : विविध मागण्यांसाठी मूळ गावात गेलेल्या पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांमध्ये वन विभागाने १८ जानेवारी रोजी शोधमोहीम राबवली. या मोहिमेच्या नावाखाली पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांची नासधूस करण्यात आली, तसेच त्यांचे जेवण फेकून दिल्याचा आरोप विष्णू राऊत यांनी केला आहे. 

ठळक मुद्देग्रामस्थांचा आरोप वन विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कपोपटखेड : विविध मागण्यांसाठी मूळ गावात गेलेल्या पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांमध्ये वन विभागाने १८ जानेवारी रोजी शोधमोहीम राबवली. या मोहिमेच्या नावाखाली पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांची नासधूस करण्यात आली, तसेच त्यांचे जेवण फेकून दिल्याचा आरोप विष्णू राऊत यांनी केला आहे. मेळघाटमधून पुनर्वसन होऊन मौजे गुल्लरघाट, धारगड, केलपाणी, बारुखेडा, आमोना, सोमठाणा बु., सोमठाणा खु. नागरतास या गावांचे अकोट तालुक्यामधे पुनर्वसन झाले होते. पुनर्वसित गावांमधील नागरिक त्यांना शेती मिळत नसल्याने २५ डिसेंबर २0१७ रोजी आमोना मार्गे पोच मार्गाने मेळघाटातील पूर्वीच्या गावी पोहोचले होते. पूर्वीच्या गावी जाऊन पुनर्वसित आदिवासी नागरिकांना चोवीस दिवस झाले आहेत. या चोवीस दिवसांपासून ते शांततेने आंदोलन करीत आहेत. १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान  गुल्लरघाट, धारगड, बारुखेडा, नागरतास या गावांमध्ये वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी तपासणीच्या नावाखाली आदिवासी नागरिकांच्या साहित्याची नासधूस केली. तसेच त्यांच्या जेवणाचीही नासाडी केली. तसेच पुनर्वसित आदिवासी लोकांशी असभ्य वागणूक केली, अशी माहिती पुनर्वसित आदिवासी ग्रामस्थ विष्णू राऊत यांनी दिली. राऊत यांनी सांगितले, की आम्ही सर्व आदिवासी गेल्या २४ दिवसांपासून शांततेने आमच्या मागणीकरिता आंदोलन करीत आहोत. आम्ही मेळघाटमधील जंगल तसेच जंगली प्राणी, वन विभाग कर्मचारी, अधिकारी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही; परंतु वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देत आहेत. आम्हाला जोपर्यंत शेती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन शांतपणे सुरूच ठेवणार आहोत, असेही ते म्हणाले. वन विभागाकडून आम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिल्यास काही विपरीत घडले, तर याला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशारा विष्णू राऊत यांनी दिला आहे. 

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पakotअकोट