शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

अकोट : गव्याचा मृत्यू; आदिवासींवर संशय; वन विभागाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:30 IST

अकोट : नगरतास येथील संरक्षित क्षेत्रात पाणवठय़ाजवळ १४ जानेवारी रोजी विषबाधेतून गव्याचा मृत्यू झाला आहे. ही विषबाधा पुनर्वसित ग्रामस्थांनी केल्याचा संशय वन विभागाला असल्याने वनाधिकार्‍यांनी त्यांच्या घरांची १८ जानेवारी रोजी तपासणी केली. या तपासणी दरम्यान  ग्रामस्थांनी कुर्‍हाडी, विळे, काचकुर्‍या व लोखंडी गज याने वन कर्मचार्‍यांवर हल्ला केला. या घटनेमुळे वन विभागाने तब्बल ३२ ग्रामस्थांविरोधात चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्दे३२ जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : नगरतास येथील संरक्षित क्षेत्रात पाणवठय़ाजवळ १४ जानेवारी रोजी विषबाधेतून गव्याचा मृत्यू झाला आहे. ही विषबाधा पुनर्वसित ग्रामस्थांनी केल्याचा संशय वन विभागाला असल्याने वनाधिकार्‍यांनी त्यांच्या घरांची १८ जानेवारी रोजी तपासणी केली. या तपासणी दरम्यान  ग्रामस्थांनी कुर्‍हाडी, विळे, काचकुर्‍या व लोखंडी गज याने वन कर्मचार्‍यांवर हल्ला केला. या घटनेमुळे वन विभागाने तब्बल ३२ ग्रामस्थांविरोधात चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट वन्यजीव विभागाच्या क्षेत्रातील ८ गावांचे अतिसंरक्षित वनक्षेत्रातून अभयारण्याबाहेर पुनर्वसन झाले आहे. या ग्रामस्थांनी अवैधरीत्या २५ डिसेंबर रोजी पुन्हा मूळ गावात प्रवेश केला असून, हे ग्रामस्थ अवैध कृत्य करीत असल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली होती. दरम्यान पाणवठय़ातील पाण्यामध्ये विष टाकल्यामुळे गव्याचा मृत्यू झाला.  हे कृत्य पुनर्वसित गावात परतलेल्या ग्रामस्थांनीच केल्याचा संशय असल्यावरून उपवनसंक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनसंरक्षक व २00  वन कर्मचार्‍यांनी ग्रामस्थांच्या रहिवासी परिसराची तपासणी करण्यासाठी  पुनर्वसन झालेल्या धारगड, गुल्लरघाट, बारुखेडा, नगरतास या गावात सर्च ऑपरेशन राबविले. यावेळी अधिकार्‍यांवर ग्रामस्थांनी हल्ला केला मात्र तो परतून लावत वनाधिकार्‍यांनी ग्रामस्थांच्या घरातून ३५ कुर्‍हाडी, ३५ विळे व लोखंडी गज जप्त करण्यात आले आहे.  दरम्यान वनविभागाने ही कारवाई आकासा पोटी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात उपवनसरंक्षक जी. गुरूप्रसाद यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. 

आमच्याकडे कुठलेही शस्त्र नाही. विळा, कुर्‍हाड, हे घरीच असते त्याचा वापर प्राण्यांचा जीव घेण्यासाठी आम्ही करत नाही. आमच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू असून तो दडपण्याकरीता वनविभाग ग्रामस्थांवर खोटे आरोप लावत आहे. -विष्णू राऊत,पुनर्वसित ग्रामस्थ प्रतिनिधी 

टॅग्स :akotअकोटMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प