शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अकोट : गव्याचा मृत्यू; आदिवासींवर संशय; वन विभागाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:30 IST

अकोट : नगरतास येथील संरक्षित क्षेत्रात पाणवठय़ाजवळ १४ जानेवारी रोजी विषबाधेतून गव्याचा मृत्यू झाला आहे. ही विषबाधा पुनर्वसित ग्रामस्थांनी केल्याचा संशय वन विभागाला असल्याने वनाधिकार्‍यांनी त्यांच्या घरांची १८ जानेवारी रोजी तपासणी केली. या तपासणी दरम्यान  ग्रामस्थांनी कुर्‍हाडी, विळे, काचकुर्‍या व लोखंडी गज याने वन कर्मचार्‍यांवर हल्ला केला. या घटनेमुळे वन विभागाने तब्बल ३२ ग्रामस्थांविरोधात चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्दे३२ जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : नगरतास येथील संरक्षित क्षेत्रात पाणवठय़ाजवळ १४ जानेवारी रोजी विषबाधेतून गव्याचा मृत्यू झाला आहे. ही विषबाधा पुनर्वसित ग्रामस्थांनी केल्याचा संशय वन विभागाला असल्याने वनाधिकार्‍यांनी त्यांच्या घरांची १८ जानेवारी रोजी तपासणी केली. या तपासणी दरम्यान  ग्रामस्थांनी कुर्‍हाडी, विळे, काचकुर्‍या व लोखंडी गज याने वन कर्मचार्‍यांवर हल्ला केला. या घटनेमुळे वन विभागाने तब्बल ३२ ग्रामस्थांविरोधात चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट वन्यजीव विभागाच्या क्षेत्रातील ८ गावांचे अतिसंरक्षित वनक्षेत्रातून अभयारण्याबाहेर पुनर्वसन झाले आहे. या ग्रामस्थांनी अवैधरीत्या २५ डिसेंबर रोजी पुन्हा मूळ गावात प्रवेश केला असून, हे ग्रामस्थ अवैध कृत्य करीत असल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली होती. दरम्यान पाणवठय़ातील पाण्यामध्ये विष टाकल्यामुळे गव्याचा मृत्यू झाला.  हे कृत्य पुनर्वसित गावात परतलेल्या ग्रामस्थांनीच केल्याचा संशय असल्यावरून उपवनसंक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनसंरक्षक व २00  वन कर्मचार्‍यांनी ग्रामस्थांच्या रहिवासी परिसराची तपासणी करण्यासाठी  पुनर्वसन झालेल्या धारगड, गुल्लरघाट, बारुखेडा, नगरतास या गावात सर्च ऑपरेशन राबविले. यावेळी अधिकार्‍यांवर ग्रामस्थांनी हल्ला केला मात्र तो परतून लावत वनाधिकार्‍यांनी ग्रामस्थांच्या घरातून ३५ कुर्‍हाडी, ३५ विळे व लोखंडी गज जप्त करण्यात आले आहे.  दरम्यान वनविभागाने ही कारवाई आकासा पोटी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात उपवनसरंक्षक जी. गुरूप्रसाद यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. 

आमच्याकडे कुठलेही शस्त्र नाही. विळा, कुर्‍हाड, हे घरीच असते त्याचा वापर प्राण्यांचा जीव घेण्यासाठी आम्ही करत नाही. आमच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू असून तो दडपण्याकरीता वनविभाग ग्रामस्थांवर खोटे आरोप लावत आहे. -विष्णू राऊत,पुनर्वसित ग्रामस्थ प्रतिनिधी 

टॅग्स :akotअकोटMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प