शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य!

By admin | Updated: September 18, 2014 02:18 IST

‘लोकमत’च्या व्यासपीठावर महापौर, उपमहापौरांची ग्वाही

अकोला : महापालिकेच्या स्थापनेला १३ वर्षांचा कालावधी उलटून गेला असताना अद्यापपर्यंत अकोलेकरांना साध्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. विकास कामे तर होतीलच; परंतु नागरिकांची खरी गरज लक्षात घेता, अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांनाच प्राधान्यक्रम दिला जाणार असल्याची ग्वाही महापौर उज्ज्वला देशमुख व उपमहा पौर विनोद मापारी यांनी ह्यलोकमतह्णच्या व्यासपीठावर दिली. अकोला शहराच्या विकासासाठी मागील १३ वर्षांपासून भाजप-शिवसेना युतीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नरत असल्याचे चित्र आहे. मोठय़ा आवेशात विकासाच्या गप्पा होत असल्या तरी वस्तुस्थिती मात्र निराळी आहे. एकीकडे विकास कामांचे दिवास्वप्न रंगविल्या जात असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेतल्यास प्रशासनाच्या प्रामाणिकतेची कीव येते. पथदिवे बंद असले तरी त्यांचे कोट्यवधींचे देयक नित्यनेमाने अदा होते. शहरात ठिकठिकाणी पसरलेली घाण, अस्वच्छता अकोलेकरांच्या मुळावर उठली असून, प्रत्येक घराला आजाराचा विळ खा आहे. धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असतानादेखील नागरिकांना आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्यात येतो. अकोलेकरांजवळून कर वसूल करणारी महापालिका नागरिकांना साध्या मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यास असर्मथ ठरल्याचे चित्र आहे. अर्थातच, अकोलेकरांना विकासापेक्षा मूलभूत सुविधांची जास्त निकड असल्याचे लक्षात येते. या सर्व मुद्यांवर भाजप-शिवसेना युतीच्या नवनिर्वाचित महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी यांनी ह्यलोकमतह्णच्या व्यासपीठावर सविस्तर चर्चा करीत त्यांची भूमिका विशद केली. यामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासोबतच त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी काही संकल्पना प्र त्यक्षात राबविण्याचा मानस व्यक्त केला. प्रशासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांसह अकोलेकरांच्या समन्वयातूनच शहराचा विकास शक्य असल्याचे मत महापौर, उपमहा पौरांनी व्यक्त करीत विचारलेल्या प्रश्नांवर दिलखुलासपणे चर्चा केली.