शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अकोलेकरांना तीन दिवस पाणी नाही!

By admin | Updated: October 15, 2015 02:42 IST

मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी.

अकोला/बाश्रीटाकळी: महान धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने पाणीपुरवठय़ाचे काटेकोरपणे नियोजन करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली असतानाच बुधवारी पहाटे कान्हेरी सरप गावानजिक शहराला पाणीपुरवठा करणारी मनपाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. पाण्याचा दाब प्रचंड असल्याने शेतानजिकच्या नाल्यांना अक्षरश: पूर आल्याचे चित्र ग्रामस्थांना पहावयास मिळाले. हा प्रकार उजेडात आल्यानंतर मनपाच्या जलप्रदाय विभागाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, किमान तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे.महान धरण ते अकोला शहरापर्यंत ९00 मि.मी.व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले आहे. बुधवारी पहाटे चार वाजता शहरातील जलकुंभात पाणी पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु जलकुंभात उशिराने पाणी पोहोचत असल्याचे महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना शोध घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सकाळी ६ वाजता कान्हेरी सरप गावानजिक मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचे उजेडात आले. ९00 मी. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचा दाब प्रचंड असल्याने शेतानजिकच्या नाल्यांना अक्षरश: पुर आला होता. पहाटे चार वाजतापासून सुरू झालेली गळती जलवाहिनीतील पाणी संपेपर्यंत सुरू होती. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेल्याचा अंदाज मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे.