शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अकोलेकरांना तीन दिवस पाणी नाही!

By admin | Updated: October 15, 2015 02:42 IST

मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी.

अकोला/बाश्रीटाकळी: महान धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने पाणीपुरवठय़ाचे काटेकोरपणे नियोजन करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली असतानाच बुधवारी पहाटे कान्हेरी सरप गावानजिक शहराला पाणीपुरवठा करणारी मनपाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. पाण्याचा दाब प्रचंड असल्याने शेतानजिकच्या नाल्यांना अक्षरश: पूर आल्याचे चित्र ग्रामस्थांना पहावयास मिळाले. हा प्रकार उजेडात आल्यानंतर मनपाच्या जलप्रदाय विभागाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, किमान तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे.महान धरण ते अकोला शहरापर्यंत ९00 मि.मी.व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले आहे. बुधवारी पहाटे चार वाजता शहरातील जलकुंभात पाणी पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु जलकुंभात उशिराने पाणी पोहोचत असल्याचे महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना शोध घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सकाळी ६ वाजता कान्हेरी सरप गावानजिक मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचे उजेडात आले. ९00 मी. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचा दाब प्रचंड असल्याने शेतानजिकच्या नाल्यांना अक्षरश: पुर आला होता. पहाटे चार वाजतापासून सुरू झालेली गळती जलवाहिनीतील पाणी संपेपर्यंत सुरू होती. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेल्याचा अंदाज मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे.