शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोल्यातील विधीज्ञांची पंतप्रधानांविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 18:29 IST

अकोला- लातुर जिल्ह्यातील औसा येथे ९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा घटनेतील शहिदांचा तसेच एअर स्ट्राईकमध्ये सहभागी जवानांच्या नावावर मते मागीतली. सैन्याच्या नावावर राजकारण करण्याचा हा प्रकार असून यामुळे पंतप्रधानांवर आदर्श आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार अकोल्यातील काही विधीज्ञांनी जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिली.

अकोला- लातुर जिल्ह्यातील औसा येथे ९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा घटनेतील शहिदांचा तसेच एअर स्ट्राईकमध्ये सहभागी जवानांच्या नावावर मते मागीतली. सैन्याच्या नावावर राजकारण करण्याचा हा प्रकार असून यामुळे पंतप्रधानांवर आदर्श आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार अकोल्यातील काही विधीज्ञांनी जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिली.अकोला जिल्हाधिकारी तसेच निवडणुक निर्णय अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत विधिज्ञांनी नमूद केले आहे की, पंतप्रधान मोदीनी औसा येथिल सभेत मतदारांना त्याचे मतदान पुलवामा घटनेतील शहिदांना समर्पित होऊ शकते का? तुमचे मतदान वालाकोट येथे एअर स्ट्राईक मध्ये सहभागी सैनिकांसाठी समर्पित होऊ शकते का? अशा शब्दात आवाहन केले. भारतीया सैनिकांच्या व शहिद जवानांच्या नावाचा वापर करून राजकारण करण्याच्या या प्रकारामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचार करण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच यु-टयुब या सोशल मीडीयावर ७ एप्रिल रोजी भाजपा या चॅनलच्या माध्यमातून थीम साँग मध्येही सैनाच्या कारवाईचे फोटो तसेच चित्रफितींचा वापर केला आहे. हासुद्धा आचारसंहितेचा भंग असून यु टयुब वरील भारतीय जनता पार्टी या चॅनलवरही बंदी घालण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रारीवर अ‍ॅड.मो.परवेज, अ‍ॅड. प्रवीण पी.देशमुख, अ‍ॅड.मंगेश बोर्डे, अ‍ॅड.राजेश डी.पवार, अ‍ॅड.राजेश जाधव, अ‍ॅड.उदय देशमुख, अ‍ॅड.नंदकिशोर शेळके, अ‍ॅड.काजी हसन अली यांच्या स्वाक्षरी आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदी