शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

अकोला जि.प. च्या बंद होणार्‍या ३३ शाळांच्या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:42 IST

अकोला : एकीकडे खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी देतानाच सरकारने राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या या  निर्णयाचा फटका पश्‍चिम वर्‍हाडातील ३३ शाळांना बसला आहे.

ठळक मुद्देपश्‍चिम वर्‍हाडातील चित्र चिमुकल्या विद्यार्थ्यांची सात ते दहा किमीपर्यंत पायपीट!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एकीकडे खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी देतानाच सरकारने राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या या  निर्णयाचा फटका पश्‍चिम वर्‍हाडातील ३३ शाळांना बसला आहे. या  बंद होणार्‍या शाळांतील सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या शाळांमध्ये समायोजित केले जात आहे, त्या शाळांचे अंतर ७ ते १0  किमी आहे. शिक्षणासाठी आता विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार असून, अर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना एक किमीच्या आतच शिक्षणाची सोय असावी, अशी तरतूद आहे;  जिल्हा परिषदेने अनेक गावांमध्ये शाळा सुरू करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली; मात्र या शाळांमध्ये पुरेशी विद्यार्थी संख्याच नाही. शिक्षणाचा दर्जा व गुणवत्तेच्या कारणामुळे पटसंख्या खालावली आहे. त्यामुळे त्या शाळाच बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला.  अकोल्यात १७, बुलडाण्यात ८, वाशिममध्ये ९ शाळा बंद झाल्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगली गुणवत्ता असलेल्या शाळेत टाकण्याची तयारी केली. यासाठी तीनही जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर केला. प्रस्तावाला मंजुरीनंतर बंद होणार्‍या  शाळांतील चिमुकल्यांना आता किमान सात ते कमाल १0 किलोमीटरपर्यंंतच्या शाळेत समायोजित व्हावे लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना येणार्‍या खर्चाच्या भुर्दंंडाला सामोरे जावे लागणार आहे.  

विद्यार्थ्यांंना मिळावी परिवहन सुविधाज्या गावांमध्ये कमी विद्यार्थी संख्येअभावी शाळा सुरू करणे शक्य नाही, अशा गावांमधील विद्यार्थी इतर गावांमध्ये शिक्षणासाठी जात असतील तर त्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून ३00 रुपये प्रतिमहा असे दहा महिन्यांचे ३ हजार रुपये मिळतात. तोच नियम बंद होणार्‍या या शाळांसाठी लावण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.