शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अकोला जिल्हा परिषदेच्या मालमत्तेची नावाने नोंदच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:58 IST

अकोला : जिल्हा परिषदेकडे असलेल्या स्थावर, जंगम मालमत्तांची नोंद महसुली कागदपत्रांवर जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतच्या नावे नोंद करून घेण्याचा आदेश शासनाने पाच वर्षांपूर्वीच दिला असताना त्यानुसार कोणतीही नोंद अद्यापही झाली नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या मोक्याच्या जागा इतर विभागाला हस्तांतरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी लगतच्या काळात दिला आहे.जागांची कागदोपत्री नोंद महाराष्ट्र शासन किंवा सरकार अशी असल्याने ताब्यात असलेल्या यंत्रणेचा आक्षेप विचारात घेण्याची तसदीही जिल्हाधिकाºयांनी घेतली नाही.

अकोला : जिल्हा परिषदेकडे असलेल्या स्थावर, जंगम मालमत्तांची नोंद महसुली कागदपत्रांवर जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतच्या नावे नोंद करून घेण्याचा आदेश शासनाने पाच वर्षांपूर्वीच दिला असताना त्यानुसार कोणतीही नोंद अद्यापही झाली नाही. त्यामुळे मालमत्ता अधिकारी म्हणून जबाबदारी असलेल्या पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात मालमत्तेचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांच्या थेट आदेशाने जागा इतर विभागाच्या घशात जाण्याची संधीच निर्माण झाली आहे.जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या जागा इतर विभागाला हस्तांतरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी लगतच्या काळात दिला आहे. त्या जागांची कागदोपत्री नोंद महाराष्ट्र शासन किंवा सरकार अशी असल्याने ताब्यात असलेल्या यंत्रणेचा आक्षेप विचारात घेण्याची तसदीही जिल्हाधिकाºयांनी घेतली नाही. हस्तांतरित झालेल्या जागा आधीच जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतच्या नावे नोंद झालेल्या असत्या तर तो फेरफार रद्द करण्यासाठी संबंधित यंत्रणेला विचारल्याशिवाय जागा हस्तांतरण होण्यास आडकाठी झाली असती; मात्र जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे हातातील मोक्याच्या जागा विनासायास इतर विभागाच्या घशात घालण्याची संधीच उपलब्ध ठेवण्यात आली. परिणामी, जिल्हा परिषदेच्या जागा हळूहळू शासनाच्या इतर विभागाच्या ताब्यात जाण्याची चिन्हे आहेत.

- २०१३ मध्येच फेरफार करण्याचा आदेशजिल्हा परिषदेकडे तीन प्रकाराच्या खुल्या जमिनी, इमारती ताब्यात आहेत. त्या सर्व स्थावर, जंगम मालमत्तेची नोंद ज्या क्षेत्रात असेल, त्या म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतच्या नावे करून घेण्याचे निर्देश शासनाने २५ मार्च २०१३ रोजीच मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत; मात्र तेव्हापासून कोणत्याही जमीन अथवा मालमत्तेची फेरफारानुसार तशी नोंद जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने करून घेतली नाही. त्यामुळे त्या जागांवर कागदोपत्री महाराष्ट्र शासन, सरकार अशीच नोंद आहे. या मुद्यांवरच जमिनीचा हस्तांतरण आदेश करणे जिल्हाधिकाºयांसाठी सोयीचे आहे.

- जिल्हा परिषदेकडे असलेल्या जागा- जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १०० नुसार हस्तांतरित योजनांची कार्यवाही करण्यासाठी हस्तांतरित झालेल्या इमारती, खुल्या जागा. - भूतपूर्व जिल्हा लोकल बोर्ड यांच्याकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झालेल्या खुल्या जागा व इमारती. - जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी स्वत:च्या उत्पन्नातून खरेदी केलेल्या जागा, इमारती.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद