शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

अकोला जिल्हा परिषदेचे २९ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

By admin | Updated: March 22, 2016 02:23 IST

अर्थसंकल्पीय सभेत योजना-विकासकामांसाठी निधीची तरतूद.

अकोला: जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत सन २0१६-१७ या वर्षासाठी २९ कोटी ९ लाख ७२ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी मंजूर करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजना आणि विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत अर्थ सभापती राधिका धाबेकर यांनी जिल्हा परिषदेचे सन २0१६-१७ या वर्षीचे विभागनिहाय अंदाजपत्रक मांडले. जिल्हा परिषदेला ११ कोटी २६ लाख ५0 हजार रुपये महसुली प्राप्ती अपेक्षित असून, भांडवली जमा रक्कम २ लाख ६७ हजार रुपये आणि आरंभीची शिल्लक १५ कोटी १८ लाख ४६ हजार रुपये विचारात घेता, २ लाख २४ हजार रुपये शिलकीचे आणि २९ कोटी ९ लाख ७२ हजार रुपये मूळ खर्चाचे अर्थ सभापतींनी मांडलेले अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले. मंजूर करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात कृषीसह विविध योजना आणि विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत अर्थ सभापती राधिका धाबेकर यांनी जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाचे वाचन केले. यावेळी उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, कृषी सभापती रामदास मालवे, समाजकल्याण सभापती गोदावरी जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) के.आर. तापी यांच्यासह सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मनपा हद्दवाढीला विरोधाचा ठराव मंजूर!महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीमध्ये शहराजवळील २४ गावांचा समावेश करण्याचा घाट रचला जात असून, शहराची अवस्था बकाल झाली आहे. रस्ते, पिण्याचे पाणी अशा समस्या असताना, हद्दवाढीमध्ये शहराजवळील २४ गावांचा समावेश मनपा क्षेत्रात केल्यास गावांचे काय होणार, असा सवाल उपस्थित करीत जिल्हा परिषद सदस्य दामोदर जगताप, चंद्रशेखर पांडे गुरुजी,ज्योत्स्ना चोरे, विजय लव्हाळे व इतर सदस्यांनी मनपा हद्दवाढीस तीव्र विरोध दर्शविला. आधी शहराचा विकास करण्यात यावा, नंतरच हद्दवाढीमध्ये गावांचा समावेश करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. सदस्यांच्या मागणीनुसार हा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.ह्यकृषीह्णसाठी भरीव तरतूद करा!जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात कृषी विभागासाठी करण्यासाठी आलेली तरतूद लक्षात घेता, कृषी विभागासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केली. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी विशेष मदतीसह कृषी विभागासाठी अंदापत्रकात एक कोटी रुपयांची वाढ करण्याची मागणी त्यांनी केली.